AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haryana Flood News : हरियाणात 12 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 854 गावात पाणी भरले, नद्यांच्या वाढत्या जलपातळीमुळे अडचणी वाढल्या

Haryana Rain Updates : हरियाणा राज्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पूराच्या पाण्यामुळे सोळा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 लाख एकरवरील सगळी पीक जमीनदोस्त झाली आहेत.

Haryana Flood News : हरियाणात 12 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 854 गावात पाणी भरले, नद्यांच्या वाढत्या जलपातळीमुळे अडचणी वाढल्या
hariyanaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2023 | 10:53 AM
Share

मुंबई : हरियाणा राज्यात पाऊस (Haryana Rain Updates) मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु आहे. त्याचा फटका तिथल्या १२ जिल्ह्यांना बसला आहे. 854 गावात पाणी भरले असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. लोकांना घरातून बाहेर पडायला जागा नसल्यामुळे त्याचे हाल होत आहेत. लाईट गायब झाली आहे. काही लोकांना खाण्यासाठी काहीचं मिळत नाहीये, तिथं दाखल झालेली एनडीआरएफ टीम लोकांना मदत करीत आहे. हरियाणा (Haryana Flood News) राज्यातील 3674 लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. मारकंडा, घग्गर, सरस्वती या नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे १२ जिल्ह्यात सगळीकडं पाणीचं पाणी दिसत आहे. यमुना नदीच्या (yamuna river) पाण्याची पातळी सध्या खालावली आहे.

जीटी रोड बेल्टच्या सहा जिल्ह्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अंबाला, यमुनानगर, करनाल, कैथल, कुरुक्षेत्र आणि पानीपत या जिल्ह्यातील 585 गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. 4 लाख एकरवरील सगळी पीकं पूर्णपणे खराब झाली आहेत. त्याचबरोबर घग्गर नदीचं पाणी चीका शहरात भरलं आहे. त्याचबरोबर मारकंडा नदीचं पाणी शाहाबादपासून कुरुक्षेत्र पर्यंत पोहोचलं आहे.

यमुनानगरच्या हथिनी कुंड बैराज या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे तिथं अधिक धोका जाणवतं आहे. त्याचबरोबर कुरुक्षेत्र शहरात पाणी यूनिवर्सिटीच्या तिसऱ्या गेटपर्यंत गेलं आहे, तिथं सुद्धा एनडीआरएफची टीम लोकांना मदत करत आहे. वायुसेनाने सुध्दा अंबाला येथील सात गावातील लोकांना काल साहित्य पोहोचवलं आहे. आता पाणी पलवल जिल्ह्यात पोहोचलं आहे. पलवल जिल्ह्यात २४ गावात आतापर्यंत पाणी पोहोचलं आहे.

इतक्या लोकांचा मृत्यू

हरियाणा राज्यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. काल सुध्दा दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. करनालमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आणखी एक व्यक्ती पाण्यातून वाहून गेला आहे. हरियाणा सरकारच्या म्हणण्यानूसार कुरुक्षेत्र, करनाल, कैथल, अंबाला, फतेहाबाद, पानीपत, सोनीपत, यमुनानगर, पंचकूला या जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळं लोकांचा मृत्यू झाला आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.