घरांना तडे गेले, भिंती कोसळल्या; आसामसह पूर्वोत्तर राज्य जोरदार भूकंपांनी हादरले

आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांना आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. (6.4 Earthquake In Assam, Aftershocks; Tremors In Northeast)

घरांना तडे गेले, भिंती कोसळल्या; आसामसह पूर्वोत्तर राज्य जोरदार भूकंपांनी हादरले
earthquake
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 10:21 AM

गुवाहाटी: आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांना आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सकाळी सातच्या सुमारास सर्वात मोठा झटका बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 नोंदवली गेली. आसाममध्ये तर इमारतींनाही तडे गेले. अनेक घर आणि प्लॅटमधील भिंतीचे प्लास्टर कोसळून पडले. घरातील भांडीकुंडीही जमिनीवर आदळल्याने येथील प्रचंड घाबरून गेले आहेत. आज झालेल्या जोरदार भूकंपांमुळे पूर्वोत्तर राज्यातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. (6.4 Earthquake In Assam, Aftershocks; Tremors In Northeast)

आसामसह पूर्वोत्तर राज्यात आज सकाळी 10 मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे झटके बसले. भूकंपाचा पहिला झटका सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 एवढी नोंदवली गेली. त्यानंतर लेगचंच सात मिनिटांनी म्हणजे 7. 58 मिनिटांनी भूकंपाचा दुसरा झटका बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 एवढी नोंदवली गेली. त्यानंतर तीन मिनिटांनी पुन्हा तिसरा भूकंपचा धक्का जाणवला. 8 वाजून एक मिनिटाने भूकंपचा तिसरा झटका बसला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 एवढी नोंदवली गेली. दहा मिनिटातच भूकंपाचे लागोपाठ तीन झटके बसल्याने पूर्वोत्तर राज्यातील नागरिक प्रचंड हादरून गेले.

घराला तडे, भिंतीही कोसळल्या

सोनितपूर जिल्हा मुख्यालय तेजपूर, गुवाहाटी आणि आसाममधील अनेक जिल्ह्यातील इमारतींना भूकंपामुळे तडे गेले. भिंतीचं प्लास्टर कोसळलं. काही क्षण जमीन हलल्याने घरातील भिंतीवरील सामान अचानक कोसळले. तसेच घराजवळच्या भिंती कोसळून पडल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले आणि त्यांनी उघड्यावर थांबणं पसंत केलं. मात्र, लागोपाठ तीन भूकंपाचे झटके बसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपानंतर कोणीही घरात जाण्यास धजावत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सोनितपूर जिल्ह्यात भूकंपाचा केंद्र बिंदू

आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करून या भूकंपाची माहिती दिली आहे. या भूकंपाचे केंद्र बिंदू सोनितपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरमा यांनी भूकंपाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यावरून हा भूकंप किती जोरदार होता याचा अंदाज येतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसेच केंद्राकडून सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांना दिलं आहे. (6.4 Earthquake In Assam, Aftershocks; Tremors In Northeast)

संबंधित बातम्या:

जामिन मिळून 10 दिवस उलटल्यानंतरही लालूंची तुरुंगातून सुटका नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन

केरळने असं काय केलं, ज्यामुळे तिथे ऑक्सिजनचा अजिबात तुटवडा नाही?

(6.4 Earthquake In Assam, Aftershocks; Tremors In Northeast)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.