AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातलं असं एक गावं जीथं कोरोनापासून नाही तर शेकडो वर्षांपासून पाळलं जातं सोशल डिस्टेंसिंग, साधा स्पर्श झाला तरी होते भयानक शिक्षा

या गावात गेल्या शेकडो वर्षांपासून सोशल डिस्टेंसिंग प्रथेचं काटेकोरपणे पालन केलं जातं, उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा सुनावली जाते.

भारतातलं असं एक गावं जीथं कोरोनापासून नाही तर शेकडो वर्षांपासून पाळलं जातं सोशल डिस्टेंसिंग, साधा स्पर्श झाला तरी होते भयानक शिक्षा
| Updated on: Nov 16, 2024 | 5:29 PM
Share

भारत हा एक अतिप्राचीन देश आहे. भारतामध्ये अनेक संस्कृतींचा विकास झाला आणि काळाच्या ओघात या संस्कृती नष्ट देखील झाल्या. मात्र नष्ट होत असताना त्यांनी काही प्रथा परंपरा आणि इतिहासाच्या रुपानं आपल्या पाऊल खुणा ठेवल्या. ज्यामुळे आपल्याला त्या संस्कृतीबद्दल माहिती होण्यास मदत होते. तो इतिहास समजून घेता येतो. आजही देशात असे अनेक गावं आहेत, ज्या गावात पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं. प्रसंगी या प्रथांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला दंड किंवा शिक्षा देखील होते. भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतात असे अनेक खेडे आहेत, जेथील लोक आजही आपल्या प्रथा परंपराचं पालन मोठ्या अस्थेनं करतात, त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. आज आपण अशाच एका गावाबद्दल माहिती घेणार आहोत.

जे गाव हे हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लू जिल्ह्यात आहे. ज्याचं नाव मलाना असं आहे.  मलाना गाव आपल्या अनोख्या प्रथांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. जेव्हा संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक झाला होता, तेव्हा त्याच्यापासून बचावासाठी म्हणून सोशल डिस्टेंसिंगचा पर्याय समोर आला. मात्र या गावात कोरोनापासून नाही तर गेल्या शेकडो वर्षांपासून सोशल डिस्टेंसिंगची प्रथा पाळली जाते. बाहेरून कोणताही व्यक्ती गावात आला तर त्या व्यक्तीला इथे माणसांनाच नाही तर वस्तुंना देखील स्पर्श करता येत नाही. या मागे शुद्धतेची कल्पना आहे, त्यामुळे इथे येणारा कोणताही व्यक्ती इथल्या लोकांना किंवा तेथील लोकांना स्पर्श करू शकत नाही. जर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून मोठा दंड आकारला जातो. पहिल्यांदा दंड, मात्र दुसऱ्यावेळी पुन्हा तीच चूक केली तर मात्र तेथील पंच जी शिक्षा सुनावतील ती त्याला मान्य करावी लागते.

एवढंच नाही तर या गावाने स्वत:चे कायदे देखील स्वत: तयार केले आहेत. भारतात असून देखील भारताचे कायदे येथील स्थानिक मानत नाहीत. त्यांची स्वत:ची अशी न्याय व्यवस्था आहे. ज्यामध्ये गावातील आकरा जणांची सदस्य म्हणून निवड करण्यात येते. हेच आकरा जण येथील कायदे देखील ठरवतात. हे गाव आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे हशीस अर्थात चरसच्या उत्पादनासाठी.

सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.