AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत

आम्हाला आरोपींचे नातेवाईक आणि पंचायतीची भीती वाटते.

Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत
| Updated on: Oct 07, 2020 | 6:50 PM
Share

मेरठ: हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण अजूनही तापलेलेच आहे. अशातच आता पीडितेचे कुटुंबीय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मुलीसोबतच्या दुर्दैवी घटनेनंतर हे सर्वजण गाव सोडण्याचा विचार करत आहेत. आपल्याला गावच्या पंचायतीची भीती वाटत आहे. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, अनेक धमक्याही येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे योगी सरकारने सर्व सुरक्षा पुरवूनही पीडितेच्या कुटुंबीयांना इतकी दहशत का वाटत आहे, असा सवाल आता निर्माण झाला आहे. (Hathras victim’s family Living in fear)

सध्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या घराबाहेर पोलिसांचा २४ तास पहारा आहे. याशिवाय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. घरात येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणीही केली जाते. तरीही पीडितेच्या कुटुंबीयांना स्वत:च्या सुरक्षेची खात्री वाटत नाही.

या घटनेवरून राजकारण तापलेले असल्याने सध्या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. आरोपींच्या बाजूने असलेले लोक या नेत्यांना विरोध करत आहेत. यापूर्वी भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांना धमकी देण्यात आली होती. तर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला आलेले ‘आप’चे खासदार यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

या सगळ्या वातावरणामुळे भविष्यात आपले काय होणार, याची काळजी पीडितेच्या कुटुंबीयांना वाटू लागली आहे. त्यामुळे हे कुटुंब गाव सोडण्याचा विचार करत आहे. आम्हाला आरोपींचे नातेवाईक आणि पंचायतीची भीती वाटते. अशा परिस्थितीत गावात राहणे ठीक नाही. सरकारने आम्हाला शहरात जागा दिली तर आम्ही तिकडे जाऊन राहू, असे पीडितेच्या भावाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांना असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने हाथऱसमधील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. घरात येणाऱ्यांना त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्रत्येकी दोन-दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, गावात एक सीओ, तीन पोलीस निरीक्षक आणि १५ पुरुष आणि सहा महिला कॉन्स्टेबल बंदोबस्तावर आहेत.

संंबंधित बातम्या:

राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले

Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

(Hathras victim’s family Living in fear)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.