AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत

आम्हाला आरोपींचे नातेवाईक आणि पंचायतीची भीती वाटते.

Hathras Case: पीडितेचे कुटुंब प्रचंड दहशतीखाली; गाव सोडण्याच्या मनस्थितीत
| Updated on: Oct 07, 2020 | 6:50 PM
Share

मेरठ: हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण अजूनही तापलेलेच आहे. अशातच आता पीडितेचे कुटुंबीय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मुलीसोबतच्या दुर्दैवी घटनेनंतर हे सर्वजण गाव सोडण्याचा विचार करत आहेत. आपल्याला गावच्या पंचायतीची भीती वाटत आहे. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे, अनेक धमक्याही येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे योगी सरकारने सर्व सुरक्षा पुरवूनही पीडितेच्या कुटुंबीयांना इतकी दहशत का वाटत आहे, असा सवाल आता निर्माण झाला आहे. (Hathras victim’s family Living in fear)

सध्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या घराबाहेर पोलिसांचा २४ तास पहारा आहे. याशिवाय, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. घरात येणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टरने तपासणीही केली जाते. तरीही पीडितेच्या कुटुंबीयांना स्वत:च्या सुरक्षेची खात्री वाटत नाही.

या घटनेवरून राजकारण तापलेले असल्याने सध्या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. आरोपींच्या बाजूने असलेले लोक या नेत्यांना विरोध करत आहेत. यापूर्वी भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांना धमकी देण्यात आली होती. तर पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला आलेले ‘आप’चे खासदार यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

या सगळ्या वातावरणामुळे भविष्यात आपले काय होणार, याची काळजी पीडितेच्या कुटुंबीयांना वाटू लागली आहे. त्यामुळे हे कुटुंब गाव सोडण्याचा विचार करत आहे. आम्हाला आरोपींचे नातेवाईक आणि पंचायतीची भीती वाटते. अशा परिस्थितीत गावात राहणे ठीक नाही. सरकारने आम्हाला शहरात जागा दिली तर आम्ही तिकडे जाऊन राहू, असे पीडितेच्या भावाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांना असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने हाथऱसमधील सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे. घरात येणाऱ्यांना त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्रत्येकी दोन-दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, गावात एक सीओ, तीन पोलीस निरीक्षक आणि १५ पुरुष आणि सहा महिला कॉन्स्टेबल बंदोबस्तावर आहेत.

संंबंधित बातम्या:

राजस्थानातही बलात्कार झाला, मग राहुल गांधी तिकडे का गेले नाहीत?- आठवले

Hathras case: जातीय दंगली पसरवण्यासाठी मॉरिशसमधून 100 कोटींचा निधी, ED चा दावा

(Hathras victim’s family Living in fear)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.