देशावर दुष्काळाचे संकट, पंतप्रधान मोदी यांनी एल निनोच्या धोक्यात केले मोठे आवाहन, मॉन्सूनसाठी धोक्याची घंटा..
एल निनोचे देशावर मोठे संकट आहे. एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर दिसत आहे. प्रशांत महासागरात एल निनो प्रचंड तीव्रतेने सक्रिय झाला. त्यामध्येच आता भारताकरिता अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. जगातील हवामान संस्था याबाबत इशारा देत आहेत.

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला. देशात मॉन्सून लांबणीवर पडला. 1950 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक तीव्र स्वरूपाचा एल निनो राहण्याचा मोठा अंदाज वर्तवण्यात आला. प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआने केल्याने एकच खळबळ उडाली. भारतात या एल निनोचे गंभीर परिणाम बघायला मिळतील. एक तर अति पाऊस किंवा अती उन्ह पडू शकते. देशासमोर एस निनोचे संकट आहे. डिसेंबर महिन्यात हा एल निनो अति तीव्र होण्याचा अंदाज आहे. 1950 नंतर पहिल्यादांच हा इतका जास्त तीव्र होतोय. देशातील मॉन्सूनवर याचा परिणाम पडेल. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. गुरूवारी एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची घोषणा क्लायमे प्रेडिक्शन सेंटरने केली.
मुळात म्हणजे एल निनोचा सर्वाधिक परिणाम हा मॉन्सूनवर होतो. एल निनोमुळे सरासरीपेक्षा मॉन्सून कमी होऊ शकतो. राज्यातही मॉन्सून अद्याप दाखल झाला नाही. शेतकरी पेरणीकरिता मॉन्सूनची वाट पाहत आहेत. एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याने त्याचा परिणाम देशातील मॉन्सूनवर होईल. याची तीव्रता डिसेंबरमध्ये सर्वाधिक असेल. मॉन्सूनच्या पावसात याचा अडथळा निर्माण होऊ शकतो.
भारतातील काही राज्यात मॉन्सून कमी पडण्याचा अंदाज आहे. एल निनोचा थेट मॉन्सूनवर परिणाम दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या 11 आयोगाची बैठक घेतली. नरेंद्र मोदी यांनी एल निनोच्या स्थितीचा धोक्याचा इशारा दिला. जलसंधारणासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याबाबत त्यांनी आवाहन केले.
मोदींनी राज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एल निनोचा धोका आणि राज्यांना इशारा दिला. ज्यामुळे एल निनोचे किती मोठे संकट देशापुढे आहे, याची कल्पना होऊ शकते. जगभरातून भारताला एल निनोचा इशारा दिला जात आहे. देशातील अनेक राज्य एल निनोच्या कचाट्यात येत आहेत. जिथे मोठा दुष्काळ पडू शकतो. मॉन्सूनचा पाऊस अत्यंत कमी पडण्याचा अंदाज आहे.
