AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘M’ वर घमासान, जेव्हा भाजपाने राहुल गांधींचा खापर पणजोबा काढला!

राहुल गांधी यांनी बुधवारी एक ट्वीट करत विचारलं की, "जगातील जास्तकरुन हुकूमशहांची नाव M वरुन का सुरु होतात?".

'M' वर घमासान, जेव्हा भाजपाने राहुल गांधींचा खापर पणजोबा काढला!
| Updated on: Feb 04, 2021 | 8:47 AM
Share

नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 70 दिवसांपासून दिल्लीत (Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi) शेतकरी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शेतकऱ्यांना मोठं समर्थन देताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी एक ट्वीट करत विचारलं की, “जगातील जास्तकरुन हुकूमशहांची नाव M वरुन का सुरु होतात?”. यावर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी उत्तर दिलं आहे (Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi).

त्यांनी सांगितलं, ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्याला काँग्रेसही गंभीरतेने घेत नाही. जर ‘एम’पासून सुरु केलं तर मोतीलाल नेहरु यांचंही नाव येतं. त्यामुळे त्यांना जरा बघून टिप्पणी करायला हवी’.

नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधीने ट्वीट करत विचारलं, ‘जगातील अनेक हुकूमशहांची नावं ‘M’ पासून का सुरु होतात? मार्कोस, मुसोलिनी, मिलोसेविच, मुबारक, मोबुतु, मुशर्रफ, माइकॉम्बेरो.’ राहुल गांधी यांचं हे ट्वीट व्हायरल झालं. त्यानंतर भाजपने यावर प्रतिउत्तर दिलं.

भारताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का लागला : राहुल गांधी

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप लावला की भारताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का लागला आहे आणि भाजप आणि आरएसएसने देशाची ‘सॉफ्ट पावर’ला ध्वस्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या सुरक्षेची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यासाठीच त्यांना निवडण्यात आलं आहे. (Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi)

‘सरकार किल्लाबंदी का करत आहे?’

काँग्रेस नेते म्हणाले, ‘सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सरकार किल्लेबंदी का करत आहे? ते शेतकऱ्यांना घाबरतात का? शेतकरी त्यांचे शत्रू आहेत का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना मारणे, धमकावणे सरकारचं काम नाही. सरकारचं काम चर्चा करणे आहे आणि समस्येचं समाधान काढणं आहे. शेतकरी मागे हटणार नाही. अखेर सरकारला मागे पाऊल घ्यावे लागेल. यातच सर्वांचं भलं आहे की सरकारने मागे हटावं’.

Narendra Singh Tomar Reply To Rahul Gandhi

संबंधित बातम्या :

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, ‘हे तर बीसीसीआयचे काम!’

मोठी बातमी: नाना पटोलेंनी घेतली राहुल गांधींची भेट; प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचाली अंतिम टप्प्यात

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.