AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Election 2024 | आज दिल्लीत महत्वाच्या घडामोडी, पंतप्रधान मोदी घेणार महाराष्ट्रातील खासदारांची बैठक

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपासाठी खूप महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून येतात. महाराष्ट्रासाठी भाजपाने मोठं लक्ष्य ठेवलं आहे.

Loksabha Election 2024 | आज दिल्लीत महत्वाच्या घडामोडी, पंतप्रधान मोदी घेणार महाराष्ट्रातील खासदारांची बैठक
pm narendra modiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 08, 2023 | 8:49 AM
Share

नवी दिल्ली : पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची भाजपाप्रणीत NDA आणि काँग्रेसप्रणीत INDIA ने आतापासून तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून बैठकांचे सत्र आहे. काँग्रेसप्रणीत INDIA ची पहिली बैठक बिहार पाटना येथे झाली. त्यानंतर बंगळुरुला दुसरी बैठक आणि आता मुंबईत तिसरी बैठक होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. त्याचवेळी भाजपाने सुद्धा छोट्या-छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन NDA ची वीण भक्कम करायला सुरुवात केली आहे.

बंगळुरुत INDIA ची बैठक पार पडली. त्याचवेळी दिल्लीत NDA ची बैठक झाली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील खासदारांना भेटणार आहेत.

मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील किती खासदार उपस्थित राहणार?

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे.

महाराष्ट्रासाठी भाजपाचा लक्ष्य काय?

सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी खासदारांना मार्गदर्शन करतील. महारष्ट्र खूप महत्त्वाचा आहे

सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा आहे. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक 48 खासदार येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन वर्षात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत आहे. त्याचवेळी शिंदे गट आणि अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.