Andhra Pradesh Violence : कोनासीमा जिल्ह्याच्या नामांतरावरुन आंध्र प्रदेश पेटलं, जमावाने मंत्री, आमदाराचं घर जाळलं! अनेक पोलीस जखमी

काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचं नाव कोनासीमा असं करण्यात आलं होतं. आता या जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर असं करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी आंध्र प्रदेशच्या विविध भागात मोठा हिंसाचार सुरु झाला.

Andhra Pradesh Violence : कोनासीमा जिल्ह्याच्या नामांतरावरुन आंध्र प्रदेश पेटलं, जमावाने मंत्री, आमदाराचं घर जाळलं! अनेक पोलीस जखमी
आंध्र प्रदेशात हिंसाचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:37 PM

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये मंगळवारी मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. कोनासीमा (Konaseema) जिल्ह्याच्या नामकरणावरुन नाराज असलेल्या जमावाने आमदार पोन्नाडा सतीश यांचं घर जाळलं. कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलल्यामुळे लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. त्यातूनच हा हिंसाचार (Violence) भडकल्याचं सांगितलं जातं. जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली, अनेक वाहनं जाळली, इतकंच नाही तर पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचं नाव कोनासीमा असं करण्यात आलं होतं. आता या जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर (B. R. Ambedkar) असं करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी आंध्र प्रदेशच्या विविध भागात मोठा हिंसाचार सुरु झाला.

कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बी. आर. आंबेडकर करण्यावरुन लोकांमध्ये अशांतता पसरली. त्यांच्या मते जिल्ह्याचं नाव कोनासीमाच असावं. दुसरं कुठलंही नाव या जिल्ह्याला देण्यात येऊ नये. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरुन राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन करत आहेत. नामकरणावरुन नाराज शेकडो लोक अमलापुरम पोहोचले आणि त्यांनी शहरात मोठी हिंसाचार केला. वाहनांची, घरांची जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीमुळे आंध्र प्रदेशात मोठा तणाव पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

हिंसाचारात 20 पोलीस जखमी

मंगळवारी रात्रीपर्यंत आंध्र प्रदेशमधील रस्त्यावर हिंसाचार सुरु होता. आंदोलकांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवण्यात आला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या अनेक वाहनांना आग लावण्यात आली. जमावाने केलेल्या दगडफेकीत 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अनेक लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अमलापुरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून जमावबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

कोनासीमा साधना समितीकडून मोर्चाचं आयोजन

4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यातून कोनासीमा जिल्हा वेगळा करण्यात आला. मागच्या आठवड्यात राज्य सरकारने कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आणि लोकांकडून सूचना मागवली होती. यावर कोनासीमा साधना समितीकडून नामांतराच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला. जिल्ह्याचं नाव कोनासीमाच ठेवण्याची मागणी त्यांनी केली. समितीकडून मंगळवारी जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांनी जिल्ह्याचं नाव बदलण्याविरोधात निवेदन देण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.