AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरूच शकत नाही; सत्तासंघर्षाची सुनावणी संपताच अनिल देसाई यांनी केलेला दावा काय ?

सर्वोच्च न्यायालयात अनेकडा चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा. हाच मुद्दा कळीचा ठरू शकतो का ? यावर खासदार अनिल देसाई यांनी मोठा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरूच शकत नाही; सत्तासंघर्षाची सुनावणी संपताच अनिल देसाई यांनी केलेला दावा काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2023 | 5:01 PM
Share

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा कळीचा मुद्दा होऊच शकत नाही. सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगतिलं कि बहुमत चाचणी झाली असती तर 39 आमदार अपात्र झाले असते. पण, 2019 ला ज्या नियमानुसार गटनेते आणि प्रतोद पदाची निवड झाली त्याच नियमानुसार 27 जूनला ही झाली होती. आणि तोच व्हीप ( Whip ) 3 जुलैलाही होता. त्यामध्ये 39 आमदार हे अपात्र होऊ शकतातच. त्यांनी आत्ताही उल्लंघन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरू शकतो असे नाही असं स्पष्ट खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बहुमत चाचणी झाली असतो तर 39 जणांनी मतदान कुठे केले दिसले असते असे कोर्ट म्हणाले त्यावर आमच्या वकिलांनी बाजू मांडली. की तोच व्हीप विधानसभा अध्यक्ष यांच्या निवडीवेळीही तोच व्हीप होता असं अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांनी राजीनामा दिला हा कळीचा मुद्दा त्यासाठी होत नाही. 39 आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे. 27 जून ला काय आणि 3 जुलै काय एकच व्हीप होता असा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आल्याचे अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दाही युक्तिवादाच्या दरम्यान आला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जातांना व्हीपचे उल्लंघन केले असते तरचा अपात्रही कारवाई हा मुद्दा चर्चेत आला होता.

याशिवाय ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपल्या नंतर भावनिक विधान केले आहे. त्यावरही अनिल देसाई यांनी भाष्य केले आहे. अनिल देसाई यांनी सिब्बल यांनी लढविलेल्या जुन्या केसेसचा संदर्भही यावेळेला दिला आहे.

अनिल देसाई म्हणाले कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केले आहे. महत्वाच्या केसेस त्यांनी लढविल्या आहेत. अनेक दशकं त्यांनी काम केले आहे. भारताची घटना जी सर्वोच्च आहे. आणि सर्वोच्च अशा ठिकाणी त्यांनी काम केलं आहे.

संविधानाची मूल्ये कुठेही कमी होता कामा नये, यासाठी त्यांनी विधान केले आहे. भावनिक होऊन ते बोलले आहे की देशाच्या लोकशाहीला अखेरच्या घटका करू नयेत असं कपिल सिब्बल यांनी म्हणणं साहजिकच असल्याचे अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

कपिल सिब्बल हे जेष्ठ वकिल असून त्यांनी अनेक मोठ्या लढाया केल्या आहेत. त्यामुळे लोकशाही तशीच सुरक्षित राहावी असं कपिल सिब्बल यांनी म्हंटलं असल्याचे अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

Follow Us
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी
विधानपरिषदेबाबत ठाकरे आज निर्णय घेतील, मात्र काँग्रेस... संजय राऊतांनी.
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर....
मराठी सक्तीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; मागे हटत असाल तर.....
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?
विधान परिषदेसाठी मविआत पेच कायम; ठाकरे विधान परिषद न लढण्यावर ठाम?.
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा
उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यास विधान परिषदेवर काँग्रेसचा दावा.
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.