AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना सीमेवर मायनस टेम्प्रेचरमध्ये का उभं करु नये? भाजप मंत्र्यांचा सवाल

राहुल गांधी यांनी देशाच्या सीमांवर मायनस तापमानात तैनात करावे, अशी खोचक टीका अनिल विज यांनी केली. (Anil Vij Rahul Gandhi)

राहुल गांधींना सीमेवर मायनस टेम्प्रेचरमध्ये का उभं करु नये? भाजप मंत्र्यांचा सवाल
अनिल विज राहुल गांधी
| Updated on: Jan 26, 2021 | 10:10 AM
Share

नवी दिल्ली: हरियाणा राज्य सरकारमधील मंत्री भाजप नेते अनिल विज (Anil Vij) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींनी देशाच्या जवानांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. राहुल गांधी यांना देशाच्या सीमांवर मायनस तापमानात तैनात करावे, अशी खोचक टीका अनिल विज यांनी केली. (Anil Vij slams Rahul Gandhi over comment on jawans)

अनिल विज यांनी टविट करुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “राहुल गांधी वारंवार देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तापमानात तैनात करावं. देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व गोष्टी समजतील”, असं अनिल विज म्हणाले.

अनिल विज यांचं ट्विट

राहुल गांधी काय म्हणाले होते? तामिळनाडूमध्ये एका रॅलीमध्ये बोलताना राहुल गांधींनी देशातील सरकारनं शेतकरी आणि मजुरांचा विश्वास जिंकल्यास सीमांवर सैनिक तैनात करण्याची गरज नसल्याचं म्हटलं होते. ” जर भारतातील मजूर, शेतकरी, विणकर मजबूत आणि संरक्षित झाल्यास चीन भारताच्या भूभागात पाय ठेवण्याचं धाडस करणार नाही”, असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

राहुल गांधींनी आणखी एक ट्विट करत “चीन भारतीय क्षेत्रात कब्जा करत आहे. मागील काही महिन्यांपासून ‘मिस्टर 56 इंच’ यांनी एकदाही चीन हा शब्द म्हटलेला नाही.”, असं टीकास्त्र राहुल गांधींनी सोडलं होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवे तीन कृषी कायदे भारतीय शेतीला उद्ध्वस्त करणारे आहेत. कृषी कायद्यांद्वारे भारतीय शेती दोन- तीन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा प्रयत्न आहे,अशी टीका राहुल गांधींनी केली. पंतप्रधानांकडून शेतकरी, कामगार आणि देशातील छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी देश चालवला जात नसून काही उद्योगपतींसाठी चालवला जातो, असा आरोप राहुल गांधींनी केला. तामिळनाडूच्या नागरिकांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या:

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांवर हल्ले, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल सुरुच

(Anil Vij slams Rahul Gandhi over comment on Jawans)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.