AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला

निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला.

नागपुरचे 'निकरवाले' तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला
rahul gandhi
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 25, 2021 | 8:51 AM
Share

चेन्नई :  नागपुरचे ‘निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला. ‘निकरवाले नाही तर तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील आणि त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे’, असं राहुल गांधी म्हणाले. (Congress Rahul Gandhi Slam RSS In tamilnadu Nikarwale never decide Future of State)

तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर तुफान हल्लाबोल केलाय. ‘तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल’, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाने ज्या प्रकारे भारताचं अध:पतन होतंय, हे आता आपल्याला थांबवायला हवं. मोदींना भारताना पायाच नष्ट करायचाय. आपण सगळे मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढू’, अशी साद राहुल गांधींनी यावेळी जनतेला घातली.

‘मन की बात’ सांगायला आलो नाही ऐकायला आलोय…

“मी आपल्याशी माझी ‘मन की बात’ सांगायला आलो नाही. मी आलोय ते तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढायचा असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील हे समजून घेण्यासाठी… मी इथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलोय. ना की माझ्या मनातली ‘मन की बात सांगण्यासाठी…’, असं म्हणत त्यांनी मोदींच्या ‘मन की बात’वर सडकून टीका केली.

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत या विषयावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी समजून घेण्याऐवजी सरकार त्यांना दहशतवादी ठरवून मोकळं होत आहे. या प्रवृत्तीविरोधात आपल्याला लढायचं आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

यंदाच्या वर्षीच तामिळनाडू विधानसभेची निवडणूक

तामिळनाडू विधानसभेची निवडणूक याच वर्षी आहे. 2016 साली पाठीमागची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. आता 2021 म्हणजे याच वर्षी इथे निवडणूक पार पडणार आहे. राहुल गांधी तीन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. 23 जानेवारीला त्यांचं तामिळनाडूत आगमन झालंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत राजकीय वातावरण तापलंय. यामुळे आतापासूनच नेतेमंडळींनी प्रचाराला सुरुवात केलीय.

(Congress Rahul Gandhi Slam RSS In tamilnadu Nikarwale never decide Future of State)

हे ही वाचा :

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची, सामनातून भाजपवर टीका

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना