AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचे आणखी मोठे यश, ULFA सोबत करणार शांतता करार

ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शुक्रवारी केंद्र सरकार उल्फासोबत शांतता करार करणार आहे. गेल्या काही वर्षात अनेक दहशतवादी कारवायांमुळे या परिसरात अशांतात होती. व्यापाऱ्यांच्या हत्येमुळे दहशतीचे वातावरण होते.

मोदी सरकारचे आणखी मोठे यश, ULFA सोबत करणार शांतता करार
modi shah
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 29, 2023 | 2:12 PM
Share

ULFA Assam Peace Accord : मोदी सरकारला आणखी एक मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण केंद्र सरकार आणि आसाम सरकार 29 डिसेंबर रोजी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) सोबत शांतता करार करणार आहेत. ईशान्येकडील शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. या करारादरम्यान गृहमंत्री अमित शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि अल्फा सपोर्टचे अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. यादरम्यान शांतता करारावर स्वाक्षरी केली जाईल. या बैठकीत इंटेलिजेंस ब्युरोचे संचालक तपन डेका आणि ईशान्य बाबींचे सरकारी सल्लागार ए के मिश्रा हेही उपस्थित राहणार आहेत.

उल्फा म्हणजे काय?

उल्फा ही आसाममधील सक्रिय दहशतवादी संघटना आहे. 7 एप्रिल 1979 मध्ये परेश बरुआ आणि त्यांचे भागीदार अरबिंदा राजखोवा, गुलाब बरुआ उर्फ ​​अनुप चेतिया, समीरन गोगोई उर्फ ​​प्रदीप गोगोई आणि भद्रेश्वर गोहेन यांनी स्थापन केले होते. आसामला स्वायत्त आणि सार्वभौम राज्य बनवण्याचा त्याचा उद्देश होता. त्यासाठी अनेक मोठे हल्लेही झाले. 31 डिसेंबर 1991 रोजी उल्फा कमांडर-इन-चीफ हिरक ज्योती महल यांच्या मृत्यूनंतर सुमारे 9 हजार उल्फा सदस्यांनी आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर जवळपास 17 वर्षांनी 2008 मध्ये उल्फा नेता अरबिंदा राजखोवा यांना बांगलादेशातून अटक करण्यात आली होती. नंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. या संघटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार 1990 पासून काम करत आहे. अनेकवेळा लष्करी कारवाई करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांच्या हत्येने दहशत

उल्फामुळे आसाममध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता. आसाममधील अनेक चहाचे व्यापारी आसाम सोडून गेले होते. या व्यापाऱ्यांना सतत धमक्या येत होत्या. त्यांच्याकडून खंडणीची मागणी करण्यात आली. अनेक व्यावसायिकांच्या हत्येनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. राज्य आणि निमलष्करी दलाच्या कारवाईनंतरही त्यांना आळा घालता आला नाही. यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न तीव्र करण्यात आले. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी एक करार झाला आहे.

उल्फाने 1990 मध्ये सुरेंद्र पॉल नावाच्या चहा व्यापाऱ्याची हत्या केली होती. त्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढच्याच वर्षी 1991 मध्ये एका रशियन अभियंत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. 2008 मध्ये उल्फाने मोठा हल्ला केला होता. 30 ऑक्टोबर रोजी एकूण 13 बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट किती मोठे होते याचा अंदाज या हल्ल्यांमध्ये 77 जणांचा मृत्यू झाला यावरूनच लावता येतो. या हल्ल्यांमध्ये 300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार