AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीर नंतर आणखी एका खासदाराचा राजकारणातून संन्यास

गौतम गंभीर याने राजकारणातून संन्यास घेतला आहे. क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्यासाठी त्याने राजकारणातून संन्यास घेत असल्याचं म्हटलं आहे. खासदार म्हणून संधी दिल्याने त्याने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. गौतम गंभीर नंतर आणखी एका खासदाराने संन्यास घेतला आहे.

गौतम गंभीर नंतर आणखी एका खासदाराचा राजकारणातून संन्यास
bjp
| Updated on: Mar 02, 2024 | 5:04 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी शनिवारी राजकारणातून सन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे.त्यांनी पक्ष नेतृत्वाला राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून ते त्यांच्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकतील. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीयेत. त्यांच्यानंतर आणखी एका भाजप खासदाराने संन्यास घेतला आहे.

आणखी एका खासदाराचा संन्यास

झारखंडमधील हजारीबागमधून भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी देखील राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. जयंत सिन्हा यांनी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. भाजपने अजून आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. आज संध्याकाळी ६ वाजता भाजपची पत्रकार परिषद आहे. यादरम्यान भाजपली पहिली यादी जाहीर होऊ शकते.

गौतम गंभीर यांच्यानंतर निवडणूक लढवण्यास नकार देणारे ते जयंत सिन्हा हे दुसरे भाजप खासदार आहेत. ते माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. जयंत सिन्हा हे देखील मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ राज्यमंत्री राहिले आहेत.

मोदी आणि शाहांचे मानले आभार

गौतम गंभीरने देखील संन्यास घेतला आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले, “मी पक्षाध्यक्ष जे.पी. यांना पत्र लिहिले आहे. नड्डा यांनी मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त केले जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे.

2014 आणि 2019 च्या निवडणुका भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर जिंकल्या होत्या. आता देखील भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2001 ते 2014 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2014 ला त्यांनी वाराणसी आणि वडोदरा येथून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय मिळवल्यानंतर त्यांनी वडोदरा येथून राजीनामा दिला. आता ते तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत.

दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा हे गांधीनगरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मोदी सरकारमधील पंतप्रधान मोदींचे ते सर्वात विश्वासू सहकारी आहेत. भाजपची रणनीती आखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.