AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही…’ काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?

Upendra Dwivedi : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. पद सोडण्यापूर्वी द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना मोठा इशारा दिला आहे.

'भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही...' काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?
Army Chief General Upendra DwivediImage Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 10:53 PM
Share

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. अशातच आता द्विवेदी यांनी शत्रूराष्ट्रांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतासाठी एक नवा पायंडा निर्माण झाला आहे, जिथे आता दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही. तसेच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांची भीती भारतासाठी आता संपली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही…

जनरल द्विवेदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने हे सिद्ध केले आहे की अण्वस्त्रांची धमकी आता दहशतवादासाठी ढाल ठरू शकत नाही. भारताविरोधात आवाज उठवला तर त्याचे उत्तर अचूक, पूर्वनियोजित आणि अत्यंत विनाशकारी असेल. कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. भारताची तयारी आणि निर्धार कायम असून पहलगाम हल्ल्याचा बदला ही केवळ सुरुवात होती. आता भारत दहशतवाद्यांना त्यांच्या ठिकाणी घुसून शिक्षा देण्याची क्षमता ठेवतो.’

रुद्र ब्रिगेड आणि भैरव बटालियन युद्धासाठी सज्ज

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जनरल द्विवेदी यांनी सांगितले की, ‘भारतीय लष्कर आता केवळ सीमांचे संरक्षण करणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रूला निर्णायक उत्तर देईल. यासाठी रुद्र ब्रिगेड, भैरव बटालियन आणि अश्वनी ड्रोन प्लाटून यांसारख्या अत्याधुनिक आणि घातक युनिट्स तयार करण्यात येत आहेत. “जमिनीवर स्मार्ट बूट, आकाशात गरुडासारखी नजर आणि क्लाऊडमध्ये बुद्धिमत्ता.” हे आमचे ब्रीदवाक्य आहे.

चीन आणि एलएसीबाबतही स्पष्ट भूमिका

चीन सीमेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या स्थिर असली तरी ती संवेदनशील आहे आणि सतत सतर्क राहण्याची गरज आहे. दोन्ही देशांचे सैन्य गैरसमज टाळण्यासाठी आणि सीमावादाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी दरवर्षी 1,100 हून अधिक वेळा स्थानिक पातळीवर चर्चा करते. म्हणजेच सरासरी दररोज सुमारे तीन वेळा दोन्ही देशांचे अधिकारी संवाद साधतात. पुढे बोलताना त्यांनी ‘LAC वर भारताची तैनाती अत्यंत मजबूत असून कोणत्याही आव्हानाला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.’ अशी माहिती दिली.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?