AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको सोडून गेली म्हणून तो मरायला निघाला, पण बिर्याणीमुळे असा वाचला त्याचा जीव

माणूस डिप्रेशनमध्ये असला की चुकीचे विचार त्याचा मनात येतात. यावेळी तो अनेक चुकीच्या गोष्टी करतो. कोलकातामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. बायको सोडून गेली आणि व्यवसायात नुकसान झाल्याने तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. पण शेवटी एका बिर्याणीने त्याचा जीव वाचवला आहे.

बायको सोडून गेली म्हणून तो मरायला निघाला, पण बिर्याणीमुळे असा वाचला त्याचा जीव
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jan 23, 2024 | 9:49 PM
Share

BIRYANI SAVE LIFE : बायको सोडून गेली म्हणून तो माणूस मरायला तयार झाला. कोलकाता पोलिसांनी एका व्यक्तीला भेटले जो आपल्या पत्नीने त्याला सोडून गेल्यामुळे आणि व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आपला जीव देण्यास निघाला होता. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील पुलावर चढून त्याने आत्महत्या करण्याची धमकी देत होता. पण त्या माणसाचा जीव बिर्याणीमुळे वाचला आहे. कोलकात्यात एक अशीच घटना समोर आली आहे. त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो मरण्यासाठी शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील एका पुलावर चढला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

ड्रामा पाहून पोलीस घटनास्थळी

हा सगळा ड्रामा सुरु असतानाच पोलीस तेथे पोहोचले. मग त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. पण ती व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर पोलिसांना त्याच्या मुलीकडून समजले की त्या व्यक्तीला बिर्याणी खूप आवडते. पोलिसांनी त्याला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. यानंतर त्या व्यक्तीने पुलावरून खाली उतरून आत्महत्येचा बेत रद्द केला.

ही विचित्र घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यासाठी तो पुलावर देखील चढला. पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण तो वारंवार तेथून उडी मारण्याची धमकी देत ​​होता. तो आपल्या मुलीसह दुचाकीवरून सायन्स सिटीमार्गे जात होता. त्याने अचानक आपली कार पुलासमोर थांबवली आणि आपला फोन कुठेतरी पडल्याचे आपल्या मुलीला सांगितले. मी बघेन आणि परत येईन. यानंतर तो पुलावर चढला आणि तेथून उडी मारण्याची धमकी देऊ लागला.

मुलीने सांगितले वडिलांना आवडते बिर्याणी

या व्यक्तीच्या कृत्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गट आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीशी बोलणे सुरू केले पण तो ऐकायला तयारच होत नव्हता. पोलिसांनी त्याच्या मुलीशी चर्चा केली. मुलीने सांगितले की तिचे वडील डिप्रेशनमध्ये आहेत आणि तिची आई देखील तिच्या वडिलांना सोडून गेली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर ती व्यक्ती पुलावरून खाली उतरली.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक