AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको सोडून गेली म्हणून तो मरायला निघाला, पण बिर्याणीमुळे असा वाचला त्याचा जीव

माणूस डिप्रेशनमध्ये असला की चुकीचे विचार त्याचा मनात येतात. यावेळी तो अनेक चुकीच्या गोष्टी करतो. कोलकातामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. बायको सोडून गेली आणि व्यवसायात नुकसान झाल्याने तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. पण शेवटी एका बिर्याणीने त्याचा जीव वाचवला आहे.

बायको सोडून गेली म्हणून तो मरायला निघाला, पण बिर्याणीमुळे असा वाचला त्याचा जीव
| Updated on: Jan 23, 2024 | 9:49 PM
Share

BIRYANI SAVE LIFE : बायको सोडून गेली म्हणून तो माणूस मरायला तयार झाला. कोलकाता पोलिसांनी एका व्यक्तीला भेटले जो आपल्या पत्नीने त्याला सोडून गेल्यामुळे आणि व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आपला जीव देण्यास निघाला होता. शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील पुलावर चढून त्याने आत्महत्या करण्याची धमकी देत होता. पण त्या माणसाचा जीव बिर्याणीमुळे वाचला आहे. कोलकात्यात एक अशीच घटना समोर आली आहे. त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तो मरण्यासाठी शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातील एका पुलावर चढला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

ड्रामा पाहून पोलीस घटनास्थळी

हा सगळा ड्रामा सुरु असतानाच पोलीस तेथे पोहोचले. मग त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. पण ती व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर पोलिसांना त्याच्या मुलीकडून समजले की त्या व्यक्तीला बिर्याणी खूप आवडते. पोलिसांनी त्याला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. यानंतर त्या व्यक्तीने पुलावरून खाली उतरून आत्महत्येचा बेत रद्द केला.

ही विचित्र घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली. या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यासाठी तो पुलावर देखील चढला. पोलिसांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पण तो वारंवार तेथून उडी मारण्याची धमकी देत ​​होता. तो आपल्या मुलीसह दुचाकीवरून सायन्स सिटीमार्गे जात होता. त्याने अचानक आपली कार पुलासमोर थांबवली आणि आपला फोन कुठेतरी पडल्याचे आपल्या मुलीला सांगितले. मी बघेन आणि परत येईन. यानंतर तो पुलावर चढला आणि तेथून उडी मारण्याची धमकी देऊ लागला.

मुलीने सांगितले वडिलांना आवडते बिर्याणी

या व्यक्तीच्या कृत्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन गट आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीशी बोलणे सुरू केले पण तो ऐकायला तयारच होत नव्हता. पोलिसांनी त्याच्या मुलीशी चर्चा केली. मुलीने सांगितले की तिचे वडील डिप्रेशनमध्ये आहेत आणि तिची आई देखील तिच्या वडिलांना सोडून गेली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बिर्याणी आणि नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर ती व्यक्ती पुलावरून खाली उतरली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.