AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 मध्ये 50 लाख भारतीयांनी केले स्थलांतर, संयुक्त राष्ट्रसंघाचा धक्कादायक अहवाल, स्थलांतरामध्ये चीन पहिल्या नंबरवर!

चीनमध्ये वाढलेल्या कोरोना केसेस बघता अनेकांनी चीनमधून स्थलांतर केले आहे. जागतिक पातळीवर वातावरण बदलाच्या परिणामामुळे नागरिक सातत्याने स्थलांतर करताना दिसत आहेत. आपत्तींमुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या यादीमध्ये सर्वात वर चीन आहे. चीनमधून तब्बल 60 लाख लोकांनी स्थलांतर केले.

2021 मध्ये 50 लाख भारतीयांनी केले स्थलांतर, संयुक्त राष्ट्रसंघाचा धक्कादायक अहवाल, स्थलांतरामध्ये चीन पहिल्या नंबरवर!
Image Credit source: theconversation.com
| Updated on: Jun 18, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातले. त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध यामुळे जगाभरातील तब्बल 10 कोटी लोकांनी स्थलांतर केल्याची माहिती पुढे येते आहे. इतकेच नाहीतर एकट्या भारतामध्ये (India) जवळपास 50 लाख लोकांनी आपली घरे सोडून इतरत्र स्थलांतर केले. सर्वाधिक स्थलांतर हे चीनच्या लोकांनी केले असून 60 लाख लोक स्थलांतरीत झाले आहेत. नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून ही धक्कादायक (Shocking) माहिती पुढे आलीये. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरोनाने चीनमध्ये धुमाकूळ घातला होता आणि यादरम्यान हजारो लोकांना आपल्या जीव देखील गमवावा लागला.

भारतामधून तब्बल 50 लाख लोकांनी केले स्थलांतर

चीनमध्ये वाढलेल्या कोरोना केसेस बघता अनेकांनी चीनमधून स्थलांतर केले आहे. जागतिक पातळीवर वातावरण बदलाच्या परिणामामुळे नागरिक सातत्याने स्थलांतर करताना दिसत आहेत. आपत्तींमुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या यादीमध्ये सर्वात वर चीन आहे. चीनमधून तब्बल 60 लाख लोकांनी स्थलांतर केले. तर दुसऱ्या क्रमांकावर फिलिपाइन्स आहे, तेथून 57 लोकांनी स्थलांतर केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारत असून भारतामधून तब्बल 50 लाख लोकांनी स्थलांतर केल्याचे आकडेवारीवरून समोर येते आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाची परिणाम

2021 मध्ये हिंसाचार आणि युद्धामुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे जगातील तब्बल 8 कोटी 93 लाख लोकांना इच्छा नसताना देखील स्थलांतर करावे लागले आहे. खतरनाक गोष्ट म्हणजे दहा वर्षांपूर्वीच्या आकड्याच्या तुलनेने हे बघितले गेले तर हा आकडा जवळपास दुप्पटच आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, हिंसाचार, हवामान संकट आणि अफगाणिस्तान, रशिया, युक्रेन युद्धामुळे 2021 मध्ये जगभरातील 10 कोटी लोकांना आपले घर सोडावे लागते आहे. इंटर्नल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी आपत्तींमुळे जगभर 2.37 कोटी लोकांनी आपल्याच देशात अंतर्गत स्थलांतर केले आहे.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.