AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 मध्ये 50 लाख भारतीयांनी केले स्थलांतर, संयुक्त राष्ट्रसंघाचा धक्कादायक अहवाल, स्थलांतरामध्ये चीन पहिल्या नंबरवर!

चीनमध्ये वाढलेल्या कोरोना केसेस बघता अनेकांनी चीनमधून स्थलांतर केले आहे. जागतिक पातळीवर वातावरण बदलाच्या परिणामामुळे नागरिक सातत्याने स्थलांतर करताना दिसत आहेत. आपत्तींमुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या यादीमध्ये सर्वात वर चीन आहे. चीनमधून तब्बल 60 लाख लोकांनी स्थलांतर केले.

2021 मध्ये 50 लाख भारतीयांनी केले स्थलांतर, संयुक्त राष्ट्रसंघाचा धक्कादायक अहवाल, स्थलांतरामध्ये चीन पहिल्या नंबरवर!
Image Credit source: theconversation.com
| Updated on: Jun 18, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण जगामध्ये कोरोनाने (Corona) थैमान घातले. त्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध यामुळे जगाभरातील तब्बल 10 कोटी लोकांनी स्थलांतर केल्याची माहिती पुढे येते आहे. इतकेच नाहीतर एकट्या भारतामध्ये (India) जवळपास 50 लाख लोकांनी आपली घरे सोडून इतरत्र स्थलांतर केले. सर्वाधिक स्थलांतर हे चीनच्या लोकांनी केले असून 60 लाख लोक स्थलांतरीत झाले आहेत. नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून ही धक्कादायक (Shocking) माहिती पुढे आलीये. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरोनाने चीनमध्ये धुमाकूळ घातला होता आणि यादरम्यान हजारो लोकांना आपल्या जीव देखील गमवावा लागला.

भारतामधून तब्बल 50 लाख लोकांनी केले स्थलांतर

चीनमध्ये वाढलेल्या कोरोना केसेस बघता अनेकांनी चीनमधून स्थलांतर केले आहे. जागतिक पातळीवर वातावरण बदलाच्या परिणामामुळे नागरिक सातत्याने स्थलांतर करताना दिसत आहेत. आपत्तींमुळे स्थलांतरित झालेल्या लोकांच्या यादीमध्ये सर्वात वर चीन आहे. चीनमधून तब्बल 60 लाख लोकांनी स्थलांतर केले. तर दुसऱ्या क्रमांकावर फिलिपाइन्स आहे, तेथून 57 लोकांनी स्थलांतर केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर भारत असून भारतामधून तब्बल 50 लाख लोकांनी स्थलांतर केल्याचे आकडेवारीवरून समोर येते आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाची परिणाम

2021 मध्ये हिंसाचार आणि युद्धामुळे मानवी हक्कांच्या उल्लंघनामुळे जगातील तब्बल 8 कोटी 93 लाख लोकांना इच्छा नसताना देखील स्थलांतर करावे लागले आहे. खतरनाक गोष्ट म्हणजे दहा वर्षांपूर्वीच्या आकड्याच्या तुलनेने हे बघितले गेले तर हा आकडा जवळपास दुप्पटच आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, हिंसाचार, हवामान संकट आणि अफगाणिस्तान, रशिया, युक्रेन युद्धामुळे 2021 मध्ये जगभरातील 10 कोटी लोकांना आपले घर सोडावे लागते आहे. इंटर्नल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी आपत्तींमुळे जगभर 2.37 कोटी लोकांनी आपल्याच देशात अंतर्गत स्थलांतर केले आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?