AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलं, पण मोदींकडे हे चीननं केल्याचं सांगायला धाडस नाही : असदुद्दीन ओवैसी

एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चीनच्या घुसखोरीवरुन लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलं, पण मोदींकडे हे चीननं केल्याचं सांगायला धाडस नाही : असदुद्दीन ओवैसी
| Updated on: Feb 09, 2021 | 9:45 PM
Share

नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चीनच्या घुसखोरीवरुन लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चीनने भारताच्या सीमेत घुसून अरुणाचल प्रदेशमध्ये अख्खं गाव वसवलंय तरीही मोदींकडे ते चीनने केल्याचं सांगण्यासाठी धाडस नाहीये, असा गंभीर आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला. मोदी सरकारने भारत-चीन सीमेवर चीनने हत्या केलेल्या 20 जवानांचं हौतात्म्य देखील वाया घालवल्याचाही आरोप केलाय (Asaduddin Owaisi criticize Modi Government for not speaking on China infiltration).

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “भारत-चीन सीमेवर चीनने आपल्या 20 जवानांची हत्या केली. मात्र, मोदी सरकार या जवानांचं हौतात्म्य वाया घालवत आहे. भारत अजूनही PP4-PP8 या भागात टेहाळणी करु शकत नाहीये. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ एक संपूर्ण गावचं वसवलं आहे. मात्र, हे तुम्हीच केलंय हे चीनला सांगण्याचं सरकारकडे धाडस नाहीये.”

“चीन नाथू ला, सिक्कीम या भागात घुसखोरी करत आहे. मग तरीही सरकारला आणि त्यातही पंतप्रधान मोदींना नेमकी कशाची भीती वाटती आहे? चीन भारताची जमीन बळकावत आहे आणि भारताचे पंतप्रधान चीनचं नावही घेत नाहीये. राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलताना तरी पंतप्रधान मोदी धाडस दाखवत चीनचं नाव घेतील असं वाटलं होतं,” असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

‘पुन्हा चीनने हल्ला केल्यास भारताची काय तयारी आहे?’

“चीन सातत्याने सीमेवर त्यांचं सैन्य वाढवत आहे. सीमेवर पायाभूत सुविधा तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार काय तयारी करतंय? बर्फ विरघळल्यानंतर चीनने पुन्हा एकदा भारतीय जवानांवर हल्ला केल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी सरकारची काय तयारी आहे?” असाही सवाल खासदार ओवैसी यांनी विचारलाय.

हेही वाचा :

जमिनीनंतर चीनचा आता भारताच्या पाण्यावर डोळा, पवित्र ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

चीनच्या कुरापती सुरूच; करार मोडला; नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला

व्हिडीओ पाहा :

Asaduddin Owaisi criticize Modi Government for not speaking on China infiltration

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.