AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाममधून यंदा AFSPA हटविणार, मुख्यमंत्री सरमा यांची मोठी घोषणा, नेमक प्रकरण काय?

मे महिन्याच्या सुरुवातीला सरमा यांनी सांगितले होते की अरुणाचल प्रदेशसोबतचा सीमावाद पूर्णपणे मिटला असून त्याचवेळी, मेघालयसोबत 12 पैकी 6 वादग्रस्त क्षेत्रांवरही करार झाला आहे.

आसाममधून यंदा AFSPA हटविणार, मुख्यमंत्री सरमा यांची मोठी घोषणा, नेमक प्रकरण काय?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 23, 2023 | 12:28 AM
Share

दिसपूर: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी AFSPA कायद्या संदर्भात मोठे आणि गंभीर विधान केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, या वर्षाच्या अखेरीस आम्ही आसाममधून AFSPA पूर्णपणे हटवण्याच्या तयारीत आहोत. सध्या आसाममधील 8 जिल्ह्यांमध्ये AFSPA लागू करण्यात आला आहे. तर त्याचवेळी राज्यातील पोलीस दलाला प्रशिक्षण देण्यासाठी माजी लष्करी जवानांकडूनही मदत घेतली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कमांडंटच्या परिषदेत सरमा म्हणाले की, हा निर्णय घेतल्यानंतर आसाम पोलिसांच्या बटालियनची जागा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मध्ये बदलणे सोपे जाणार आहे.

तर या कायद्यानुसार सीएपीएफची उपस्थिती आवश्यक असणार आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी आसाममधून AFSPA हटवला होता, मात्र हा कायदा अजूनही 8 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, AFSPA अंतर्गत सुरक्षा दलांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्यांचा दीर्घकाळ गैरवापर केला जात आहे. त्यावर एक वर्ग सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे.

तर दुसरी या कायद्याच्या आधारे सुरक्षा दल कोणालाही वॉरंटशिवाय अटक करू शकतात. इथेच नाही तर सुरक्षा दलाच्या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाला तर, या कायद्यामुळे त्यांना अटकेपासून आणि खटल्याला सामोरे जाण्यापासून मुक्तीही मिळू शकते.

आसाममध्ये नोव्हेंबर 1990 मध्ये, AFSPA आसामचा एक अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. तेव्हापासून हा कायदा लागू करण्यात आला आहे.

सीएम सरमा यांच्या मते, गेल्या दोन वर्षांत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे ते हा कायदा काढून टाकण्याचा विचार आणि मागणी सातत्याने होते आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला सरमा यांनी सांगितले होते की अरुणाचल प्रदेशसोबतचा सीमावाद पूर्णपणे मिटला असून त्याचवेळी, मेघालयसोबत 12 पैकी 6 वादग्रस्त क्षेत्रांवरही करार झाला आहे. तर उर्वरित 6 बाबतच्या कराराची चर्चा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?