AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार… आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा

Assam Himanta Biswa Sarma Government big decision: पहिल्या पत्नीची परवानगी न घेता दुसरे लग्न करणाऱ्या, गुपचूप लग्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आसाम राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात होणार आहे. काय आहे हा निर्णय ज्याची देशभरात चर्चा सुरू आहे?

आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार... आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा
आसाम सरकारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 18, 2026 | 5:55 PM
Share

कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. आसाममधील हिंमता बिस्वा सरमा सरकारने अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम थेट त्यांच्या पहिल्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा आज करण्यात आली. हा नियम खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे गुपचूप लग्न करणारे अथवा पहिल्या पत्नीवर दबाव टाकून दुसरे लग्न करणारे कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. या निर्णयाची आता देशात चर्चा सुरू झाली आहे. भाजप शासित राज्यात हा निर्णय लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हिंमता सरकारचे धडाकेबाज निर्णय

एकापेक्षा अधिक विवाहावंर अगोदरच बंदी

आसामध्ये समान नागरी संहिता(UGC) लागू आहे. एकापेक्षा अधिक विवाहांवर तिथे निर्बंध घालण्यात आले आहेत. आता त्यापुढे एक पाऊल टाकत सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे कायदेशीर प्रक्रिया न राबवता दुसरे लग्न झाले असेल त्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम पहिल्या पत्नीला देण्यात येणार आहे. सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने आणि महिला अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हिंमता सरकारचे हे मोठे पाऊल मानल्या जात आहे.

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका

यापूर्वी पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरही सरकारने मोठी कारवाई केली होती. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 10-15 टक्के रक्कम कपात करून ती आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. भीतीपोटी अनेकांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्यास सुरूवात केल्याचे समोर आले होते. आता अनेक विवाह पद्धतीला नवीन निर्णयाने झटका बसण्याची शक्यता आहे.

आसामध्ये काही समुदायांमध्ये बहुविवाह पद्धती होती. काळाच्या ओघात या प्रथेला आळा बसला. काही ठिकाणी कायदेशीर निर्बंध आणून ही पद्धत बंद करण्यात आली. तरीही काही पुरूष कुटुंबाच्या दबावाखाली, अपत्याच्या हव्यासाने अथवा इतर कारणांमुळे दुसरा विवाह करत असल्याचे समोर आले होते. हा विवाह गुपचूप करण्यात येत होता. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आसाम सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांवर पहिला निर्बंध आणला आहे. तर पुढील टप्प्यात खासगी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्या जाऊ शकतो. या निर्णयाचे महिला वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.  आता या निर्णयाचा पहिला फटका कोणत्या कर्मचाऱ्याला बसतो याची कुजबूज शासकीय कार्यालयांमध्ये सुरू झाली आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार