AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार, 2 जवान गंभीर जखमी

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याची माहिती समोर येत असताना आज एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 2 जवान जखमी झाले आहेत.

धक्कादायक! मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार, 2 जवान गंभीर जखमी
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 10, 2024 | 3:28 PM
Share

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिरीबाममध्ये उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी सुरक्षारक्षक गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर काही उग्रवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे एन बीरेन सिंह उद्या जिरिबाममध्ये जाणार होते. पण त्याआधीच ही हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांचा ताफा मणिपूरचा हिंसा प्रभावित जिरीबाम जिल्ह्याच्या दिशेला जात होता. या दरम्यान अचानक त्यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरु झाला. या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला. कोटलेन गावानजिक बराचवेळ दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.

उग्रवाद्यांनी 50 घरे जाळली

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये अजूनही घट झालेली नाही हेच या घटनेतून समोर येत आहे. उग्रवाद्यांनी जिरीबाम परिसरात दोन पोलीस चौकी, वन विभागाचे कार्यालय आणि 50 पेक्षा जास्त घरांना आग लावली होती. उग्रवाद्यांच्या हिंसाचारानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणादेखील सर्तक झाल्या आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. उग्रवाद्यांनी लमताई खुनौ, डिबोंग खुनौ, नुनखाल आणि बेगरा गांव या परिसरात 70 पेक्षा जास्त घरांना आग लावली होती.

मणिपूरच्या जिरीबाम येथे संशयित उग्रवाद्यांमधील 59 वर्षीय व्यक्तीच्या हत्यानंतर हिंसा भडकल्याची माहिती मिळत आहे. सोइबन सरतकुमार सिंह नावाचा व्यक्ती 6 जूनला आपल्या शेतात गेल्यानंतर गायब झाला होता. नंतर या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. मणिपूरमध्ये याआधीदेखील जातीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भडकलेल्या हिंसाचारात 200 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच काही समाजकंटकांडून महिला आणि मुलींसोबत अतिशय अमानवीय आणि संतापजनक कृत्य करण्यात आलं होतं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा