AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्या राम मंदिराचे काम मंद गतीने, निर्मितीची कामे रेंगाळण्याचे कारण आले समोर

ayodhya ram mandir news: अयोध्येतील हवामानामुळे कामगारही येथून निघून गेल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, 'एल अँड टी कंपनीला मजुरांना परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणे अशक्य नाही.

अयोध्या राम मंदिराचे काम मंद गतीने, निर्मितीची कामे रेंगाळण्याचे कारण आले समोर
ayodhya
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 31, 2024 | 8:45 AM
Share

अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा जानेवारी महिन्यात झाली. परंतु या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही. हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे राम मंदिर ट्रस्टकडून सांगितले जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मंदिराचे काम मंद गतीने सुरु आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिराच्या निर्मिती कार्यात 8000- 9000 मजूर काम करत होते. त्यातील निम्यापेक्षा जास्त मजूर काम सोडून गेले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम कामावर झाल्याचे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले. लार्सन एंड टर्बो कंपनी राम मंदिर निर्मितीचे काम करत आहेत.

डिसेंबर 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिराच्या कामासंदर्भात लार्सन एंड टर्बो कंपनीला काही महत्वाचे निर्देश दिले गेले आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत मंदिराचे काम पूर्ण करण्यासाठी मजुरांची संख्या वाढवण्याचे म्हटले गेले आहेत. मागील तीन महिन्यांपासून मंदिराचे काम धीम्या गतीने होत आहे. कारण मंदिर निर्मितीसाठी असलेल्या मजुरांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त मजुरांनी काम सोडले आहे.

कळस निर्मितीचे सर्वात मोठे आव्हान

राम मंदिराच्या विविध कामांसाठी 100 पेक्षा जास्त ठेकेदार आहेत. या ठेकेदारांनी मजुरांना कामावर ठेवले आहे. यामुळे नृपेंद्र मिश्रा यांनी या ठेकेदारांची बैठक घेतली. त्यात त्यांना मजूरांची समस्या दूर करण्याचे निर्देश दिले गेले. मंदिराच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठे आव्हान कळस निर्मितीचे आहे. दुसऱ्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यावर कळस तयार करण्यात येणार आहे. सध्याची कामाची गती पहिल्यावर दोन महिने उशीर होऊ शकतो, असे नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले आहे.

का सोडून गेले मजूर

अयोध्येतील हवामानामुळे कामगारही येथून निघून गेल्याचे मिश्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एल अँड टी कंपनीला मजुरांना परत आणण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच डिसेंबरपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणे अशक्य नाही.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!