AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasore Train Accident : रेल्वे अपघाताला महिना झाला तरी 41 मृतदेहांची ओळख पटेना, आतापर्यंत सात रेल्वे अधिकाऱ्यांना जेलची वारी

ओदिशा रेल्वे अपघातात 293 जणांचा मृत्यू तर 1000 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताला इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगला जबाबदार ठरविले गेले. नंतर हा तपासच सीबीआयकडे सोपविला गेला.

Balasore Train Accident  : रेल्वे अपघाताला महिना झाला तरी 41 मृतदेहांची ओळख पटेना, आतापर्यंत सात रेल्वे अधिकाऱ्यांना जेलची वारी
Odisha train accident balasore
| Updated on: Jul 20, 2023 | 1:59 PM
Share

मुंबई : ओदिशाच्या बालासोर ( Balasore Train Accident ) जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातात आधी तीन रेल्वे अधिकाऱ्यांना सीबीआयद्वारे अटक करण्यात आली नंतर आणखी चार अधिकाऱ्यांना अटक झाली. ड्यूटी दरम्यान हलगर्जीपणा दाखविल्याने या तीन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गु्न्हा दाखल केला होता. या अपघाताला महिना उलटला तरी अद्याप 41 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणे बाकी आहे. कारण त्यांची ओळख न पटविण्यासाठी घेतलेल्या डीएनए चाचण्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

बालासोर जिल्ह्यातील बहानगा रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवार 2 जून 2023 रोजी कोरोमंडळ एक्सप्रेस मालगाडीला धडकल्याने भीषण अपघात घडला होता. त्याच दुसऱ्या बाजूने यशवंतपूर एक्सप्रेस आल्याने तिचेही डब्बे घसरले. या अपघातात 293 जणांचा मृत्यू तर 1000 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताला आधी सिग्नल यंत्रणेतील दोष नंतर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगला जबाबदार ठरविले गेले. नंतर हा तपासच सीबीआयकडे सोपविला गेला.

स्टेशन मास्तर आणि ट्रॅफीक इन्सपेक्टरवर कारवाई

बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआय करीत असून या प्रकरणात गेल्या 7 रोजी तीन रेल्वे अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर दाखविल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता कालच याप्रकरणात बहानगा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर, बालासोरचे ट्रॅफीक इन्स्पेक्टर, सिग्नल टेक्निशियन आणि असिस्टंट डीव्हीजनल सिग्नल एण्ड टेलिकॉम इंजिनिअरचा समावेश आहे. चार अधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली नाहीत.

मृतदेहांची दुरावस्था 

बालासोर अपघाताच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने आपल्या हातात घेतल्यानंतर 7 जुलै रोजी सीबीआयने सेक्शन इंजिनियर अरुण कुमार मोहंता, सेक्शन इंजिनियर मोहम्मद आमिर खान आणि टेक्निशियन पप्पू कुमार यांना 304 ( सदोष मनुष्यवध ) आणि 201 (पुरावे नष्ट करणे ) या आरोपाखाली अटक केली होती. या अपघातात एका बोगीतील प्रवाशांंचे मृतदेह जळाल्यासारखे दिसत असून त्यांना प्रचंड दाबाच्या वीजेच्या तारांमुळे शॉक लागला असावा असे म्हटले जात आहे. या मृतदेहांपैकी 41 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या डीएनएचे नमूने त्यांच्या वारसांशी जुळतात का ? याची पाहणी केली जात आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.