AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी : कुटुंबातील 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा

केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मोठी निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत ७० वर्षापेक्षा अधिक वृद्ध व्यक्तींसाठी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी : कुटुंबातील 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा
| Updated on: Sep 11, 2024 | 8:57 PM
Share

भारतात आता ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान भारत (आरोग्य विमा योजना) अंतर्गत कव्हर मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान त्यांनी सांगितले की, ७० वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. याचा सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 4.5 कोटी कुटुंबांना फायदा होईल. या योजनेंत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कव्हरेज दिले जाईल.

केंद्रा सरकारच्या या निर्णयानंतर 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता, AB PM-JAY चे लाभ दिले जातील. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन अद्वितीय कार्ड जारी केले जाईल. AB PM-JAY अंतर्गत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांतील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःसाठी वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर मिळेल

केंद्रीय मंत्रिमंडळात 6 मोठे निर्णय घेण्यात आले. आयुष्मान भारत अंतर्गत ७० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य कव्हरेज दिले जाईल. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळात आणखी पाच मोठे निर्णय घेण्यात आले. जलविद्युत प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याच्या खर्चासाठी अर्थसंकल्पीय सहाय्य योजनेतील दुरुस्तीची मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणाच्या वतीने ई-बसच्या खरेदी आणि संचालनासाठी PM-eBus सेवा-पेमेंट सुरक्षा यंत्रणा (PSM) योजना सुरु करण्यात आली आहे.

PM इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्यूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेईकल प्रमोशन (पीएम ई-ड्राइव्ह) योजनेला दोन वर्षांच्या कालावधीत 10,900 कोटी रुपयांच्या खर्चासह, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आर्थिक वर्ष 2024-25 ते 2028-29 दरम्यान – IV ( PMGSY-IV) आणि ‘मिशन मौसम’ला दोन वर्षांमध्ये 2,000 कोटी रुपयांच्या खर्चासह अधिक हवामान-सज्ज आणि हवामान-स्मार्ट भारत तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

Follow Us
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची
केवढा हा माज? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए... चौकशीदरम्यान खरातची.
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही
भाजपच्या दहशतीला घाबरत नाही इथे लोकशाही आहे, ट्रम्पशाही नाही.