AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण… गुणरत्न सदावर्ते यांची थेट मागणी; लाड-जरांगे भेटीवरही हल्ला

गुणरत्न सदावर्ते यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले आहे. एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, अशी त्यांची मागणी आहे. आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण... गुणरत्न सदावर्ते यांची थेट मागणी; लाड-जरांगे भेटीवरही हल्ला
Ladki Bahin SchemeImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 22, 2026 | 9:59 PM
Share

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंचे लाड करण्यात येत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. जरांगे, लाड आणि उदय सामंत यांच्यावर टीका करतानाच सदावर्ते यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरही जोरदार भाष्य केलं आहे. आक्रमक होत सदावर्ते यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न रेटले आहेत. त्यामुळे सरकार त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले. कांद्याला दोन हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करतानाच एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना पैसे द्या, अशी थेट मागणीच गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टानेही लाडकी बहीणसारख्या योजनेवर टिपण्णी केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आपण जातीयवादी झालो

यावेळी त्यांनी प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवरही हल्ला चढवला आहे. संविधान जेव्हा जेव्हा अडचणीत येते, तेव्हा तेव्हा संविधानाचा एक विद्यार्थी म्हणून, एक सामन्य नागरिक म्हणून मी पुढे आलो आहे. मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. आपण अधिक जातीयवादी होत चाललो आहोत. आमचे मित्र उदय सांमत जरांगेला भेटायला गेले. त्या बैठकीत काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारला की त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजतात, असा हल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी चढवला.

पॉलिटिकली अडकले

उदय सामंत ब्राम्हण म्हणून डिस्कार्ड झाले आणि प्रसाद लाड मराठा होते म्हणून गेले. उदय सांमत म्हणाले की, त्यांच्या भूमिकेत आता प्रसाद लाड गेले आहेत. प्रसाद लाड म्हणतायेत की, मी एक मराठा म्हणून जरांगेना भेटायला आलो. उदय सामंत पॉलिटिकली अडकले आहेत. उदय सामंतांना जरांगेंचे खुट्टे बसले आहेत, असं सदावर्ते म्हणाले.

जातीसाठी माती खाल्ली

आमच्या प्रसाद लाड यांनी जरांगेचा लाड केला. माय बहीणीवर शिव्या दिल्यानंतर जातीसाठी माती खाल्ली म्हणून पावशेरी व्यक्तीकडे जात असतील तर योग्य नाही. जरांगेंच्या मागण्या संविधानाशी संबधित नाही. जरांगे फटफटफट कास्ट व्हॅलिडीटी द्या म्हणत आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा