AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफनंतर भारतासाठी अमेरिकेतून आणखी एक गुडन्यूज

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लागणार आहे, मात्र त्यापूर्वीच भारतासाठी अमेरिकेतून एक गुडन्यूज आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफनंतर भारतासाठी अमेरिकेतून आणखी एक गुडन्यूज
| Updated on: Aug 13, 2025 | 9:34 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. मात्र भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे सांगताना मोठं भाकीत केलं आहे, ट्रम्प यांच्या या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे खुद्द अमेरिकेतील लोकांना देखील ट्रम्प यांच्या या भूमिकेवर विश्वास नसल्याचं आता समोर आलं आहे. एस अँण्ड पी ग्लोबल रेटिंग्सचे डायरेक्टर यीफार्न फुआ यांनी याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित होणार नाही, भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारत ही एक ट्रेड ओरिएंटेड एकोनॉमी नाहीये, त्यामुळे याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो?

भारतीय अर्थव्यवस्थेवर टॅरिफचा काय परिणाम होऊ शकतो, यावर भाष्य करताना यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे की, मला नाही वाटत टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही निगेटिव्ह परिणाम होईल म्हणून, कारण भारत हा असा देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था ही अधिक ट्रेड ओरिएंटेड इकोनॉमी नाहीये, जर तुम्ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) तुलनेत निर्यातीच्या बाबतीत भाराताची अमेरिकेच्या संदर्भातील निर्यात जोखमी पाहिली तर ती केवळ दोन टक्के आहे. S&P च्या अंदाजानुसार टॅरिफनंतर देखील भारताच्या जीडीपी वाढीचा दर हा 6.5 टक्के राहणार आहे, म्हणजेच तो गेल्या वर्षी इतकाच राहणार आहे, त्यामुळे टॅरिफचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणू शकतो असं यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे. जर तसं झालं तर हा भारतासाठी मोठा दिलासा असणार आहे.  

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था