AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफनंतर भारतासाठी अमेरिकेतून आणखी एक गुडन्यूज

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लागणार आहे, मात्र त्यापूर्वीच भारतासाठी अमेरिकेतून एक गुडन्यूज आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफनंतर भारतासाठी अमेरिकेतून आणखी एक गुडन्यूज
| Updated on: Aug 13, 2025 | 9:34 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे. येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे. मात्र भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो हे सांगताना मोठं भाकीत केलं आहे, ट्रम्प यांच्या या टॅरिफचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे खुद्द अमेरिकेतील लोकांना देखील ट्रम्प यांच्या या भूमिकेवर विश्वास नसल्याचं आता समोर आलं आहे. एस अँण्ड पी ग्लोबल रेटिंग्सचे डायरेक्टर यीफार्न फुआ यांनी याबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित होणार नाही, भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण भारत ही एक ट्रेड ओरिएंटेड एकोनॉमी नाहीये, त्यामुळे याचा फारसा परिणाम होणार नसल्याचं यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो?

भारतीय अर्थव्यवस्थेवर टॅरिफचा काय परिणाम होऊ शकतो, यावर भाष्य करताना यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे की, मला नाही वाटत टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही निगेटिव्ह परिणाम होईल म्हणून, कारण भारत हा असा देश आहे, ज्याची अर्थव्यवस्था ही अधिक ट्रेड ओरिएंटेड इकोनॉमी नाहीये, जर तुम्ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) तुलनेत निर्यातीच्या बाबतीत भाराताची अमेरिकेच्या संदर्भातील निर्यात जोखमी पाहिली तर ती केवळ दोन टक्के आहे. S&P च्या अंदाजानुसार टॅरिफनंतर देखील भारताच्या जीडीपी वाढीचा दर हा 6.5 टक्के राहणार आहे, म्हणजेच तो गेल्या वर्षी इतकाच राहणार आहे, त्यामुळे टॅरिफचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हणू शकतो असं यीफार्न फुआ यांनी म्हटलं आहे. जर तसं झालं तर हा भारतासाठी मोठा दिलासा असणार आहे.  

असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.