AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तडकाफडकी मंजुरी

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

सर्वात मोठी बातमी ! केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तडकाफडकी मंजुरी
Modi Cabinet Minister ResignImage Credit source: Google
| Updated on: Jul 24, 2026 | 8:54 PM
Share

राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंजाबमध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून रवनीत सिंह बिट्टू यांना केंद्रीय मंत्रिपदावरून मुक्त करून पंजाबच्या राजकारणात सक्रिय करण्याबाबत पक्षात विचार सुरू असल्याची चर्चा सुरू होती. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवनीत सिंह बिट्टू पंजाब विधानसभा निवडणूक लढवू शकतात. पक्ष त्यांना आगामी निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. आता त्यांच्या जागी नव्या मंत्र्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

राजीनामा देणार हे निश्चित होते…

रवनीत सिंह बिट्टू मोदी सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते. भाजपाने काही काळापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांना राज्यसभेवर पाठवले नव्हते, त्यामुळे ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपाकडून त्यांना पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाऊ शकते. कारण पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस, भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे.

रवनीत सिंह बिट्टू यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते, मात्र त्यांचा कार्यकाळ गेल्या महिन्यात संपला. त्यानंतर आता त्यांना मंत्रिपद सोडावे लागले आहे. आता त्यांच्या जागी कुणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रवनीत सिंह बिट्टू हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लुधियाना मतदारसंघातून तर 2009 मध्ये आनंदपूर साहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...