AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रस्ते अपघातात जखमींवर कॅशलेस उपचार, योजना आहे तरी काय

Cashless Treatment Accident | मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण कमी नाही. नवीन समृद्धी महामार्ग पण त्याला अपवाद ठरला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या अपघातातील जखमींवर कॅशलेस उपचार करण्याची योजना आखली आहे. काय आहे ही योजना, कसा होईल फायदा...

मोठी बातमी! रस्ते अपघातात जखमींवर कॅशलेस उपचार, योजना आहे तरी काय
| Updated on: Dec 05, 2023 | 3:40 PM
Share

नवी दिल्ली | 5 डिसेंबर 2023 : रस्ते अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी जातो. या मृत्यूला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने उपाय करत आहे. देशभरात गेल्या काही वर्षांत दर्जेदार रस्ते झाले आहे. रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. समृद्धी, ग्रीन एक्सप्रेसवे आणि इतर अनेक मोठी रस्त्यांचे जाळे विणल्या गेले आहे. त्याच प्रमाणात अपघात पण वाढले आहे. रस्ते अपघातातील जखमींवर लागलीच उपचारासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन योजना घेऊन येत आहे. कॅशलेस उपचारासाठी खास योजना आणण्याची कवायत करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे बळी थांबू शकतील.

आता देशभर मॉडेल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) या अपघातातील जखमींवर कॅशलेस उपचार करण्याची योजना आखली आहे. पुढील तीन ते चार महिन्यात देशभरातील रस्ते अपघातातील जखमींवर त्यातंर्गत कॅशलेस उपचार करण्यात येतील. त्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. नवीन मोटार वाहन अधिनियम, 2019 अंतर्गत ही योजना कार्यन्वीत होईल. काही राज्यांत यापूर्वीच ही योजना सुरु आहे. आता अपडेटनंतर देशभर ही योजना लागू होईल.

गोल्डन आवर वाचवले प्राण

दिल्लीत नुकताच ग्लोबल रोड सेफ्टी इनिशिएटिव्ह हा कार्यक्रम घेण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रॅफिक एज्युकेशनने MoRTH च्या सहायाने हा कार्यक्रम घेतला होता. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी यांनी नवीन कायद्यात सूचीत केल्याप्रमाणे गोल्डन आवरमध्ये उपचार मिळण्याची सुविधा देण्यावर भर दिला.

5 E वर जोर

भारतात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. केंद्र सरकारने हा आकडा कमी करण्यावर भर दिला आहे. 2030 पर्यंत अपघातांची संख्या 50 टक्के कमी करण्यासाठी उपाय करण्यात येत आहे. त्यासाठी एज्युकेशन, इंजिनिअरिंग, इफोर्समेंट आणि इमरजेन्सी केअर या 5 E वर जोर देण्यात येत आहे. रस्ते अपघातात जखमींचे प्राण वाचवणे आणि त्यांना तात्काळ उपचाराची सुविधा देण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत हे बदल दिसू शकतात.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....