AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Liquor Ban: नितीश कुमार विरोधकांवर भडकले, म्हणाले दारूबंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता

दारूबंदीचा निर्णय सर्वानुमते राबवण्यात आला आहे, याचा लोकांना विसर पडला आहे. त्याला कोणत्या पक्षाचा विरोध होता का? सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांच्या संमतीने दारूबंदी लागू करण्यात आली होती," ते म्हणाले.

Bihar Liquor Ban: नितीश कुमार विरोधकांवर भडकले, म्हणाले दारूबंदीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता
Bihar CM Nitish Kumar
| Edited By: Devashri Bhujbal | Updated on: Nov 15, 2021 | 4:52 PM
Share

बिहारमध्ये दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंमूळे विरोधक मुख्यमंत्री नितीश कुमार यांचावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यावर नितीश कुमार यांनी आज प्रत्युत्तर दिले. “दारूबंदीनंतर काही लोक माझ्या विरोधात गेले, पण आम्ही नेहमीच लोकांचे आणि महिलांचे ऐकले, असे ते म्हणाले. दारूबंदीचा निर्णय सर्वानुमते राबवण्यात आला आहे, याचा लोकांना विसर पडला आहे. त्याला कोणत्या पक्षाचा विरोध होता का? सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांच्या संमतीने दारूबंदी लागू करण्यात आली होती,” ते म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, राजकीय पक्षांनी ‘दारू प्यायली तर मराल’, असा प्रचार करायला हवा. दारू किती धोकादायक आहे हे लोकांना समजले पाहिजे. दारूबंदीबाबत पुन्हा व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मंगळवारी नितीश कुमार यांनी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत दारूबंदी कायद्याचा आढावा घेतला जाणार आहे. यासोबतच बनावट दारूच्या सेवनामुळे जे मृत्यू झाले आहेत, त्या घटनांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीला बिहार सरकारचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यांचे डीएम आणि एसपीही सहभागी होणार आहेत.

2015 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2016 मध्ये दारूबंदीचा कायदा केला. याअंतर्गत बिहारमध्ये दारू विक्री आणि पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोबत असे करताना पकडल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बिहारमध्ये बनावट आणि विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे.

अलीकडेच गोपालगंज जिल्ह्यात सुमारे 40 लोकांचा आणि बेतिया जिल्ह्यातही 10 हून अधिक लोकांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. यानंतर विरोधकांसह मित्रपक्षांनीही दारूबंदीचा फेरविचार करण्यास सांगितले. त्याचवेळी खासदार चिराग पासवान यांनीही नितीश सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री नितीश कुमार दारू बनवणाऱ्या आणि तस्करांना संरक्षण देतात, त्यामुळे त्यांच घर सील करण्यात यावे, असा आरोप केला.

हे ही वाचा

Kerala RSS worker killed: 27 वर्षीय संघ कार्यकर्त्याची पत्नीसह बाहेर जाताना धारदार शस्त्रानी हत्या

IND vs NZ: नव्या खेळाडूचा Ajinkya Rahane ला धोका, उपकर्णधाराच्या करिअरवर टांगती तलवार

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक