काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बिहारमध्ये 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

बिहारमधले काँग्रेसचे 9 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बिहारमध्ये 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 4:43 PM

पाटणा :  नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. त्या पराभवातून काँग्रेस आणखी सावरलेली नाहीय. आत्मचिंतनाच्या बैठका अजूनही सुरु आहे. अशातच बिहारमध्ये काँग्रेसला आता मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. कारण कारण बिहारमधले काँग्रेसचे 9 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. (Bihar Congress 11 out Of 19 MLAs preparing to Leave Party)

बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने अ‌ॅक्टीव्ह होत संघटनात्मक बदल केले. काँग्रेस आता सावरतीय, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच काँग्रेसचे 11 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत. तशी माहितीच काँग्रेसच्या माजी आमदारांनी दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

काँग्रेस पक्षाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. 19 पैकी 11 आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता माजी आमदार भरत सिंह यांनी वर्तवली आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांच्याकडे बिहारचं काँग्रेस प्रभारीपद होतं. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी काँग्रेस हायकमांडला केली होती. त्यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारी पदावरुन मुक्त केलं. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खांदेपालटानंतर काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं पक्षातील काही नेत्यांचं म्हणणं आहे.

‘फुटणाऱ्या आमदारांनी पैसे देऊन तिकीट विकत घेतले होते’

“काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतलं आणि आमदार झाले”, असा गौप्यस्फोट भरत सिंह यांनी केला आहे.

काँग्रेस आमदार फुटणार, NDA मध्ये सहभागी होणार?

राजद आणि भाजप (NDA) आपलं संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी NDA मधील अनेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंहांनी केलाय. दरम्यान त्यांचा हा दावा काँग्रेस नेते फेटाळत आहेत. काँग्रेस पक्ष एकसंध आणि एकजूट असल्याचं काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही, पण राहुल गांधींनी चांगला प्रचार केला; काँग्रेस नेत्याकडून पाठराखण

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.