AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांच्या पत्राला भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचे चोख उत्तर, देशाला लिहिलेले खुले पत्र, म्हणाले…

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (BJP president Jagat Prakash Nadda) यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर देशातील नागरिकांना खुले पत्र (Letter) लिहिले आहे. या पत्रात नड्डा यांनी विरोधी पक्षांसह काँग्रेसवर (Congerss) जोरदार निशाणा साधला आहे. देशातील सध्याच्या जातीय तणावावर 13 राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त करताना एक निवेदन जाहिर केलं होतं. त्याला नड्डा यांनी दिले […]

विरोधकांच्या पत्राला भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचे चोख उत्तर, देशाला लिहिलेले खुले पत्र, म्हणाले...
भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 18, 2022 | 1:21 PM
Share

नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (BJP president Jagat Prakash Nadda) यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर देशातील नागरिकांना खुले पत्र (Letter) लिहिले आहे. या पत्रात नड्डा यांनी विरोधी पक्षांसह काँग्रेसवर (Congerss) जोरदार निशाणा साधला आहे. देशातील सध्याच्या जातीय तणावावर 13 राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त करताना एक निवेदन जाहिर केलं होतं. त्याला नड्डा यांनी दिले उत्तर दिलं आहे. त्यांनी यावेळी देशातील जनतेला एक खुले पत्र लिहिलं आहे. त्यात नड्डा म्हणाले की, हे पक्ष व्होट बँकेचे राजकारण करतात. राजस्थानमधील करौली येथील हिंसाचारावर मौन बाळगतात.

साधूंवर गोळीबार

व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे डोळे उघडण्यासाठी चार राज्यांचे निकाल पुरेसे आहेत. देशातील तरुणांना संधी हवी आहे. विकासाला फाळणीचे गृहन नको आहे, असे नड्डा यांनी या पत्रात दिले उत्तर दिलं आहे. 1966 मध्ये इंदिरा गांधी सरकारने गोहत्या बंदीच्या मागणीसाठी संसद भवनाकडे कूच करणाऱ्या साधूंवर गोळीबार केला. 1984 मध्ये राजीव गांधी म्हणाले होते की, जेव्हा एखादे मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी हादरते.

आदिवासींवर अत्याचार

गुजरात, मुरादाबाद, भिवंडी, मेरठ येथील दंगली, काश्मीर खोऱ्यातील हिंदूंवरील हिंसाचार, भागलपूर दंगल ही काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या दंगलींची लांबलचक यादी असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. काँग्रेसच्या राजवटीत दलित आणि आदिवासींवर अत्याचार झाले. काँग्रेसने संसदेच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. बंगाल आणि केरळमधील हिंसाचार आणि तेथील भाजप कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचार हे राजकीय पक्ष लोकशाहीकडे कसे पाहतात याची साक्ष देणाऱ्याच घटना असल्याचे यावेळी नड्डा यांनी सांगितले आहे.

विचार करण्याची गोष्ट

तसेच जेपी नड्डा यांनी पत्रात लिहिले आहे की, महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काय ही विचार करण्याची गोष्ट नाही. गेल्या आठ वर्षांत देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल झाला आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासवर पुढे जात आहे. मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की विकासाचे राजकारण करा.

इतर बातम्या :

Video: ‘होय, शरद पवार साहेब खोटं बोलले’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?

‘5 रंगांचा झेंडा एका रंगाचा कसा झाला?’, Shrimant Kokate यांचा Raj Thackeray यांना सवाल

Sangli : द्राक्षाचे तेच बेदाण्याचे, शेतकऱ्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाच, सर्वकाही व्यर्थ

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष