AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘होय, शरद पवार साहेब खोटं बोलले’ व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?

Rohit Pawar on Sharad Pawar: शरद पवार खोटं बोललं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याला ट्वीटच्या माध्यमातून रोहित पवारांनी उत्तर दिलंय.

Video: 'होय, शरद पवार साहेब खोटं बोलले' व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांनी आजोबांबद्दल असं का म्हटलं?
शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं?Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 18, 2022 | 1:10 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार खोटं बोलले, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याला ट्वीटच्या माध्यमातून रोहित पवारांनी उत्तर दिलंय. इतकंच काय, तर शरद पवार खोटं बोलले, हे मान्यही केलंय. मात्र हे मान्य केल्यानंतर त्यांनी नेमकं असं का केलं, याचं कारणही सांगितलंय. शरद पवार, बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन (Babasaheb Purandare & James Lane) या सगळ्याभोवतीचा वाद पुन्हा चर्चेत आलाय. शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत या सगळ्या वादावर पहिल्यांदाच रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली. एकूणच हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत शरद पवारांवर टीका करताना इतिहासावरुन वक्तव्य केलं होतं. राज ठाकरेंच्या वक्तव्यांना शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेत जळगावात उत्तर दिलं होतं. त्यानंतर भाजप आमदारांनीही पवारांना जोरदार टीका केली. त्या सगळ्या टीकेला आता रोहित पवार यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत पलटवार केलाय.

व्हिडीओमध्ये काय आहे?

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासोबत एका मुलाखतीदरम्यान, बातचीत करताना शरद पवारांनी 1993 साली झालेल्या बॉम्पस्फोटाविषयी सांगितलंय. एकूण 6 मिनिटं 33 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये शरद पवारांनी या बॉम्बस्फोटाचं नेमकं कारण काय होतं, हे सांगितलंय. हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतून बॉम्बहल्ला झाल्याचा संशय तेव्हा आल्याचं पवारांनी म्हटलंय. म्हणून शरद पवारांनी यावेळी 11 ऐवजी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, असं सांगितलंय. आणि यातलं बारावं ठिकाण हे मश्जिद बंदर होतं, असाही खुलासा शरद पवारांनी यावेळी मुलाखतीमध्ये दिला.

हल्ला करणाऱ्यांना धर्माच्या दंगली घडवायच्या होत्या. मात्र एकाच धर्माच्या केंद्रस्थानी हल्ले झालेले आहेत, असा संदेश जाऊ नये, म्हणून मी त्यावेळी खोटं बोललो होतो, असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

दहशतवादी हल्ल्याला तोंड देताना मुंबई कुठेही घाबरलेली नाही, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. त्यासाठी 22-22 तास यंत्रणा राबली होती. मुंबईच्या लोकांमुळे हे सगळं सुरु झालं, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलंय.

पाहा रोहित पवारांनी शेअर केलेला व्हिडीओ :

…म्हणून शरद पवारांवर टीका!

राज ठाकरेंनी केलेल्या उत्तरसभेतील टीकेवर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी जेम्स लेन प्रकरणावरुन शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा माफीनामाच वाचून दाखवलेला. तर दुसरीकडे जेम्स लेननं दिलेल्या स्पष्टीकरणात आपण कधीच बाबासाहेब पुरंदरेंना भेटलो किंवा बोललो नसल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता सर्व विरोधकांनी शरद पवारांवर टीका निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. त्यावर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.

वाचा रोहित पवार यांचं ट्वीट :

सत्ता गेल्यानं विरोधकांची तडफड?

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.