AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार
आरक्षणाबाबत भाजपची विचारधारा वेगळीच
| Updated on: Mar 05, 2021 | 8:28 AM
Share

गुवाहाटी: आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. भाजपने मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजप, एजीपी आणि यूपीपीएल एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. आसाम गण परिषद (अगप) 26, यूपीपीएल 8 तर भाजप 92 जागांवर लढणार आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. काल भाजप मुख्यालयात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. या बैठकील पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. तर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी आसामच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री हिंमत बिस्वा सरमा, आसाम प्रभारी बैजयन्त पांडा आणि सह प्रभारी पवन शर्माही उपस्थित होते.

गेल्या निवडणुकीत 60 जागांवर विजय

आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 जागांवर विजय मिळला होता. गेल्या निवडणुकीत बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) भाजप आणि अगपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी बीपीएफने 12 जागा जिंकल्या होत्या. यावेळी बीपीएफने काँग्रेस आणि एआययूडीएफसोबत आघाडी केली आहे.

सत्ता राखण्याचं आव्हान

या निवडणुकीत भाजपला सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. यावेळी भाजपचा थेट सामना काँग्रेस-एआययूडीएफ आघाडीशी होणार आहे. गेल्या दहा वर्षातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावून भाजप गेल्यावेळी सत्तेत आली होती. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका

आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. (BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

संबंधित बातम्या:

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?

केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल 60 रुपये लिटर, भाजप नेत्याचं आश्वासन

‘मिशन केरळ’साठी भाजपची मोठी खेळी; मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी

(BJP To Contest 92 Seats In Assam, 26 For AGP, 8 For Others)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.