AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने या राज्यात निवडणूक न लढवता 71 टक्के जागांवर मिळवला विजय

त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी 22 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक होणाऱ्या ठिकाणी मतमोजणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 96 टक्के जागेवर भाजपने विजय मिळवला होता.

भाजपने या राज्यात निवडणूक न लढवता 71 टक्के जागांवर मिळवला विजय
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jul 24, 2024 | 3:06 PM
Share

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुमत मिळवले नाही. परंतु एनडीएची सत्ता आली. त्यानंतर त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळत आहे. राज्यातील 71 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्रिपुरामधील एकूण 6889 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील 4805 जागांवर भाजपला निवडणूक न लढता यश आले आहे. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुका होत आहेत.

भाजपचे 4,550 उमेदवार विजयी

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव असितकुमार दास यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीमध्ये भाजपला एकूण 6,370 जागांपैकी 4,550 जागांवर यश मिळाले आहे. या ठिकाणी कोणताही प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे भाजप उमेदवारास विजयी घोषीत करण्यात आले आहे. राज्यातील 71 टक्के जागांवर आता मतदान होणार नाही. ज्या 1,819 ग्रॉमपंचायतवर मतदान होणार त्यात भाजपाने 1,809 जागांवर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. माकपाने 1,222 तर काँग्रेसने 731 जागांवर उमेदवार दिले आहे. भाजप सहाकारी टिपरा मोथा पक्षाने 138 ठिकाणी उमेदवार उभे केले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये भाजपला यश

पश्चिमी त्रिपुरा जिल्ह्यातील महेशखला पंचायत एका जागेवर मतदान होणार नाही. या ठिकाणी भाजप उमेदवाराच्या मृत्यूमुळे निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. राज्यातील 423 पंचायत समितीपैकी 235 पंचायत समितीवर बिनविरोध निवड झाली आहे. या एकूण 55 टक्के जागा आहे. आता राज्यात केवळ 188 सीट जागांवर मतदान होणार आहे. राज्यातील116 जिल्हा परिषदेपैकी 20 जागा बिनविरोध झाल्या आहे. त्या ठिकाणी भाजप उमेदवार विजयी झाले आहे. या एकूण जागांच्या 17 टक्के जागा आहेत.

त्रिपुरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 8 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्या ठिकाणी 22 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर हे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणूक होणाऱ्या ठिकाणी मतमोजणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 96 टक्के जागेवर भाजपने विजय मिळवला होता.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.