बेळगावः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याबरोबर सीमावादावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सीमावादावर सामोपचाराने विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. एकाच वेळी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याने सीमावादावर तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी सामोपचाराची भूमिका न घेता वारंवार चिथावणीखोर वक्तव्य आणि ट्विट करून सीमावाद भडकवण्याचे काम बसवराज बोम्मई यांनी केले.