AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. (Cabinet Secretary on extending Lockdown)

21 दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याच्या चर्चा, अखेर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 30, 2020 | 11:09 AM
Share

नवी दिल्ली : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याच्या चर्चा रंगलेल्या असताना केंद्राने मात्र ही शक्यता धुडकावून लावली आहे. ‘लॉकडाऊन वाढवण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. असे अहवाल वाचून मला आश्चर्य वाटले’ अशी प्रतिक्रिया कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी ‘एएनआय’ला दिली. (Cabinet Secretary on extending Lockdown)

भारतात रविवार संध्याकाळपर्यंत कोरोना व्हायरसचे एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्याची सरकारी आकडेवारी आहे. भारतातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1071 पर्यंत वाढली आहे. यापैकी 942 रुग्णांवर उपचार सुरु असून 99 जण बरे झाले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रविवारपर्यंत 34 हजार 931 रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेतल्याचं सांगितलं.

केंद्राने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना राज्य आणि जिल्हा सीमा सील करण्यास सांगितले आहे. ज्यांनी आधीच राहते ठिकाण सोडले आहे, त्यांना 14 दिवस विलग (क्वारंटाईन) ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रसारित केलेल्या ‘मन की बात’ रेडिओ शोमध्ये देशभरात लॉकडाऊन जारी केल्यामुळे होणाऱ्या अडचणींसाठी देशवासियांची क्षमा मागितली. मात्र भारत देश जीवन आणि मृत्यू यांच्यात लढाई लढत असल्यामुळे हा निर्णय गरजेचा असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला होता.

‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल. (Cabinet Secretary on extending Lockdown)

Follow Us
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरात
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरातील धक्कादायक Video
सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Congress Andolan | सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!; पडळकरांचा विरोधकांवर घणाघात
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांची भेट
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांच्या भेटीबाबत दत्तात्रय भरणे स्पष्टच म्हणाले...
कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा
Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...