AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वर्षातून 2 वेळा होणार 10 वीची बोर्ड परीक्षा

सीबीएससी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाअंतर्गत इयत्ता दहावीसाठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे.

मोठी बातमी! वर्षातून 2 वेळा होणार 10 वीची बोर्ड परीक्षा
10 class cbse exam
| Updated on: Jun 25, 2025 | 5:07 PM
Share

CBSE 10 th Class Board Exam : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता इयत्ता दहावीची वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा चालू होती. मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे. या निर्णयानंतर इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार आहे.

फेब्रुवारी, मे महिन्यात होणार परीक्षा

सीबीएसईने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच 2026 सालापासून लागू होणार आहे. फेब्रुवारी आणि मे दोन महिन्यांत इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे.

परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार?

सीबीएसईने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं परीक्षेचं ओझं कमी व्हावं त्यामुळे हे धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आता या नव्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा देता येईल. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल महिन्यात जाहीर केला जाईल. तर मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्यात जाहीर केला जाईल. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी एकूण तीन विषयात आपले गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या विषयांत विज्ञान, गणित, सोशल सायन्स आणि भाषा विषयांचा समावेश आहे.

वर्षातून एकदाच होणार मूल्यांकन

या निर्णयाअंतर्गत दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार असल्या तरी विद्यार्थ्यांच मूल्यांकन मात्र वर्षात एकदाच होणार आहे. सीबीएसईने घेतलेल्या या निर्णयाची थेट अंमलबजावणी होणार नाही. अगोदर सीबीएसई याबाबतचे नियम तयार करेल. त्यानंतर हे नियम जनतेच्या पुढे मांडण्यात येतील. लोकांच्या सूचनांना लक्षात घेऊन नंतरच या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार?

दरम्यान, सीबीएसईने हा निर्णय घेतला असला तरी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची यावर काय भूमिका असेल. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही या निर्णयाबाबत काय सूर असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार? विद्यार्थी, पालकांना याबबत कसे समजावून सांगितले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे