AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे.

केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार
| Updated on: Nov 16, 2022 | 6:40 PM
Share

नवी दिल्ली : मोबाईल हा आपल्या आयुष्यातला सध्याच्या घडीला अविभाज्य घटक बनला आहे. आपण मोबाईलशिवाय राहू शकत नाही. मोबाईल हे संवादाचं अतिशय सोपं, योयिस्कर आणि कमी खर्चिक असं माध्यम आहे. पण सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉल आपल्याला येतात. त्या स्पॅम कॉलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार यापुढे फोनवर Unkonwn नंबर नाही तर फोन करणाऱ्याचे नावच दिसणार आहे.

सरकारचा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. विशेषत: यामुळे क्राईम करणाऱ्यांचे धाबे दणाणतील. कारण मोबाईलच्या माध्यमातून Unkonwn नंबरवरुन फोन करणाऱ्याची माहिती सहज पोलिसांना उपलब्ध होण्यास मदत होईल.

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, कॉल करणाऱ्याचे थेट नावच मोबाईल स्क्रीनवर दिसेल. सिम कार्ड विकत घेताना फॉर्मवर ज्या व्यक्तीचे नाव असणार, त्या व्यक्तीचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल, असं दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आलंय.

विशेष म्हणजे दूरसंचार विभागाच्या या निर्णयामुळे आता नागरिकांना कोणत्याही ॲप शिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येईल, ज्यामुळे कॉल उचलणारी व्यक्तीदेखील आपण काय किंवा कसं बोलावं याबाबत सावध होईल.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.