AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Crisis : 46,000 मेट्रिक टन LPG भारतात आला, त्यातून किती गॅस सिलेंडर भरले जातील? देशात किती कोटी एलपीजी ग्राहक?

देशात वर्षागणिक एलपीजीची विक्री वाढत चालली आहे. पण त्या तुलनेत देशांतर्गत उत्पादन वाढलेलं नाही. आजही भारतात एकूण गरजेच्या फक्त 40 टक्के उत्पादन केलं जातं. भारत 60 टक्के एलपीजीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. यात कतर, यूएई हे मिडिल ईस्टमधील देश आहेत.

LPG Crisis : 46,000 मेट्रिक टन LPG भारतात आला, त्यातून किती गॅस सिलेंडर भरले जातील? देशात किती कोटी एलपीजी ग्राहक?
LPG Crisis
| Updated on: Mar 17, 2026 | 8:35 AM
Share

इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू LPG चं संकट निर्माण झालं आहे. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं आहे. तिथून कुठल्याही जहाजाला रवाना होण्यासाठी इराणची परवानगी घ्यावी लागते. भारताच्या कूटनितीक कौशल्यामुळे आतापर्यंत भारताची काही जहाजं हॉर्मुज स्ट्रेट पार करु शकली आहेत. गॅस संकटादरम्यान आता दिलासा देणारी एक बातमी आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज पार करुन शिवालिक हे भारतीय जहाज गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पोहोचलय. सध्याच्या स्थितीत ही एक मोठी बाब आहे. कारण या मार्गावरुन जहाज बाहेर काढणं सोपं नाहीय. मुंद्रा बंदरात आलेल्या शिवालिकमध्ये 46,000 मेट्रिक टन LPG आहे. कतरहून हे जहाज निघालं होतं.

कतरहून आलेल्या या एलपीजीमधून देशात गॅस पुरवठा होईल. शिवालिक एक मोठं गॅस वाहू जहाज आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे हे जहाज चालवल जातं. आता अनेकांच्या मनात प्रश्न हा आहे की, जे शिवालिक 46,000 मेट्रिक टन घरगुती गॅस घेऊन पोहोचलय त्यात किती सिलेंडर भरले जाऊ शकतात. जेव्हा कुठल्या देशातून एलपीजी आणला जातो, तेव्हा तो लिक्विड फॉर्ममध्ये आयात केलेला असतो. लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे गॅस जास्त आणता येतो. 46,000 मेट्रिक टनमुळे किती सिलेंडर भरले जातील?. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आधी एकूण किती किलो गॅस आणलाय ते जाणून घेणं आवश्यक आहे.

46,000 मेट्रिक टन एलपीजीमधून किती गॅस सिलेंडर भरले जातील?

जर, एक जहाज 46,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन आलय, तर सर्वातआधी ते किलोग्रॅममध्ये बदलावं लागेल. एक मेट्रिक टन म्हणजे 1000 किलोग्रॅम झाले. 46,000 मेट्रिक टन किलोमध्ये बदलल्यास एकूण एलपीजी 4,60,00,000 किलोग्रॅम होतो. शिवालिकमधून भारतात 4,60,00,000 घरगुती गॅस आलाय. भारतात घरगुती गॅस सिलेंडर 14.2 किलोग्रॅमचा असतो. त्या हिशोबाने कॅलक्युलेट केल्यास सिलेंडरची एकूण संख्या 32 लाख 39 हजारपर्यंत पोहोचते. म्हणजे कतरहून आलेल्या एलपीजीमधून भारतात एकूण 32 लाख 39 हजार गॅस सिलेंडर भरले जातील. घरासाठीचा गॅस उतरवण्याला प्राथमिकता द्या त्यानंतर इतर कामासाठी असं सरकारकडून बंदर अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

भारतात घरगुती एलपीजीचे किती कोटी ग्राहक?

आकड्यांनुसार भारत जगातील तिसरा सर्वात मोठा LPG चा ग्राहक आहे. मागच्या 10 वर्षात देशात एलपीजीची विक्री 60 टक्क्याने वाढली आहे. 2015-16 साली 19.6 मिलियन मेट्रिक टन एलपीजी लागायचा. तोच आता 2024-25 मध्ये 31.3 एमएमटीची गरज लागते. भारतात घरगुती एलपीजीचे 33 कोटी ग्राहक आहेत. 2015-16 मध्ये हीच संख्या 16.6 कोटी होती. म्हणजे घरगुती गॅस ग्राहकांची संख्या दुप्पट झाली आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.