AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार, लवकरच मोदी सरकारची मोठी योजना

रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याबाबतची ही योजना आहे. (Central government scheme on Road Accident)

रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार, लवकरच मोदी सरकारची मोठी योजना
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 01, 2020 | 4:16 PM
Share

नवी दिल्ली : मोदी सरकार रस्ते अपघातातील जखमींवरील उपचारांबाबत मोठी योजना घेऊन येत आहे.  रस्ते अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याबाबतची ही योजना आहे. (Central government scheme on Road Accident) . रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तब्बल अडीच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. (Motor vehicle relief fund)

देशात दरवर्षी जवळपास पाच लाख रस्ते अपघात होतात. जगातील सर्वाधिक रस्ते अपघात हे भारतात होतात. अपघातातील जखमी आणि मृतांची संख्याही मोठी आहे. दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू, तर तीन लाख लोक अपंग होतात. त्यामुळे आता केंद्र सरकारने अपघातातील जखमींवर अडीच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार मिळावा, त्याचा जीव वाचावा हा सरकारचा हेतू आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यांच्या परिवहन सचिवांना आणि परिवहन आयुक्तांना याबाबत पत्र पाठवलं आहे. त्यानुसार कॅशलेस ट्रीटमेंट योजनेसाठी मोटर वाहन सहाय्यता निधी  (Motor vehicle relief fund) जमा केला जाईल.

विमा कंपन्यांचीही मदत

मोटर वाहन सहाय्यता निधीत रस्ते वाहतूक मंत्रालयासह विमा कंपन्यांचाही सहभाग असेल. ज्या वाहनांचा विमा आहे आणि हिट अँड रन प्रकरणांमध्ये जखमींवरील खर्च विमा कंपन्या करतील.

रस्ते वाहतूक मंत्रालय यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अर्थात नॅशनल हेल्थ अथॉरिटीची (National Health Authority) मदत घेणार आहे. आरोग्य प्राधिकरणानेही आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू केली होती. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण रस्ते अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी मोठा वाटा उचलू शकतो.  जखमींवरील उपचारानंतर रुग्णालयांकडून आलेले क्लेम किंवा कॅशलेस प्रक्रिया राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणच परस्पर पाहून घेईल.

इन्शुरन्स नसेल तर स्वत: खर्च करावा लागेल

रस्ते अपघातातील पीडितांसाठी अपघात आणि आरोग्य सेवांसाठी एका विशिष्ट खात्यांतून निधी दिला जाईल. मात्र, जर अपघातग्रस्त गाडीचा विमा नसेल, तर भरपाई म्हणून उपाचाराचा खर्च वाहन मालकाला करावा लागेल.

दरम्यान, भारतात प्रत्येक वर्षी रस्ते अपघातात 1 लाख 50 हजारपेक्षा अधिकांचा मृत्यू होत आहे. परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताता प्रत्येक दिवशी अंदाजे 1200 रस्ते अपघात होतात. यामध्ये जवळपास 400 लोकांचा मृत्यू होतो.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे पुण्यात रस्ते अपघात घटले, एप्रिलमध्ये केवळ 3 अपघात, बळींचा आकडा…

कोल्हापुरात रस्ते अपघातांचं प्रमाण वाढलं, वर्षभरात 340 जणांचा मृत्यू

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ