AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली :  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा देखील अशाच एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांचे देखील अपघाती निधन झाल्याने सरकारने रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार आता चारचाकीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली आहे.

काय आहेत नवे नियम?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकार रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबतच अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते बदल देखील करण्यात येणार आहेत.

वाहन कंपन्यांची दुटप्पी भूमिका

पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं आहे की, अनेकदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. जेव्हा या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्यामध्ये सहा एअरबॅग असतात. मात्र जेव्हा हेच उत्पादन देशात विक्रीसाठी तयार केले जाते तेव्हा वाहनामध्ये चारच एअरबॅग असतात.

वाहन कंपन्यांकडून चुकीचा दावा

याबाबत जेव्हा कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी खर्च वाढत असल्याचे कारण सांगितले, पण मला वाटत हा कंपन्यांचा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 900 रुपये इतकाच खर्च येतो. त्यामुळेच आता प्रत्येक चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा