AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Nitin Gadkari : आता लागणार रस्ते अपघातांना ब्रेक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींनी सांगितला नवा प्लॅन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2022 | 8:22 AM
Share

नवी दिल्ली :  टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा काही दिवसांपूर्वी अपघात (accident) झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा देखील अशाच एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांचे देखील अपघाती निधन झाल्याने सरकारने रस्ते सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घेत नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार आता चारचाकीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी माहिती दिली आहे.

काय आहेत नवे नियम?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकार रस्ते वाहतूक सुरक्षिततेबाबत गांभीर्याने विचार करत आहे. कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबतच अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते बदल देखील करण्यात येणार आहेत.

वाहन कंपन्यांची दुटप्पी भूमिका

पुढे बोलताना गडकरी यांनी म्हटलं आहे की, अनेकदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची दुटप्पी भूमिका दिसून येते. जेव्हा या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्यामध्ये सहा एअरबॅग असतात. मात्र जेव्हा हेच उत्पादन देशात विक्रीसाठी तयार केले जाते तेव्हा वाहनामध्ये चारच एअरबॅग असतात.

वाहन कंपन्यांकडून चुकीचा दावा

याबाबत जेव्हा कंपन्यांकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी खर्च वाढत असल्याचे कारण सांगितले, पण मला वाटत हा कंपन्यांचा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 900 रुपये इतकाच खर्च येतो. त्यामुळेच आता प्रत्येक चारचाकी वाहनात सहा एअरबॅगची सक्ती केंद्र सरकारकडून करण्यात आली असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.