AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव गांधी हत्त्या प्रकरणात आरोपींच्या सुटकेवर केंद्र सरकारचा आक्षेप, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

राजीव गांधी हत्त्या प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने मुक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर आता केंद्र सरकाने यावर फेरविचार याचिका दाखल केली आहे.

राजीव गांधी हत्त्या  प्रकरणात आरोपींच्या सुटकेवर केंद्र सरकारचा आक्षेप, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका
नलिनी श्रीहरण Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 18, 2022 | 9:11 AM
Share

नवी दिल्ली, माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या (Rajiv Gandhi Murder) प्रकरणातील सहा दोषींच्या सुटकेच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी, जयकुमार, मुरुगन यांच्यासह 6 जणांना 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याच्या कारणावरून मुक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करताना केंद्राने म्हटले आहे की, 6 जणांच्या सुटकेचे आदेश देताना आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही.

सरकारने असेही म्हटले आहे की सहा दोषींपैकी चार श्रीलंकेचे होते आणि देशाच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येच्या जघन्य गुन्ह्यासाठी त्यांना दहशतवादी म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने तुरुंगातील चांगले वर्तन लक्षात घेऊन दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाने केले मुक्त

आरोपींची सुटका करताना न्यायालयाने हा निर्णय कैद्यांच्या चांगल्या वर्तनावर आणि या प्रकरणात दोषी ठरलेल्या एजी पेरारिवलन याच्या मे महिन्यात झालेल्या सुटकेवर आधारित असल्याचे म्हटले होते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अटकेच्या वेळी तो 19 वर्षांचा होता आणि 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होता.

या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य आणि पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत काँग्रेसने या निर्णयावर जोरदार टीका केली. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे हत्या करण्यात आली होती. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?