AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव गांधी हत्त्या प्रकरणात आरोपींच्या सुटकेवर केंद्र सरकारचा आक्षेप, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

राजीव गांधी हत्त्या प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने मुक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर आता केंद्र सरकाने यावर फेरविचार याचिका दाखल केली आहे.

राजीव गांधी हत्त्या  प्रकरणात आरोपींच्या सुटकेवर केंद्र सरकारचा आक्षेप, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका
नलिनी श्रीहरण Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 18, 2022 | 9:11 AM
Share

नवी दिल्ली, माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या (Rajiv Gandhi Murder) प्रकरणातील सहा दोषींच्या सुटकेच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने नलिनी, जयकुमार, मुरुगन यांच्यासह 6 जणांना 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याच्या कारणावरून मुक्त केले होते. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करताना केंद्राने म्हटले आहे की, 6 जणांच्या सुटकेचे आदेश देताना आपली बाजू ऐकून घेण्यात आली नाही.

सरकारने असेही म्हटले आहे की सहा दोषींपैकी चार श्रीलंकेचे होते आणि देशाच्या माजी पंतप्रधानांच्या हत्येच्या जघन्य गुन्ह्यासाठी त्यांना दहशतवादी म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि बीव्ही नगररत्न यांच्या खंडपीठाने तुरुंगातील चांगले वर्तन लक्षात घेऊन दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाने केले मुक्त

आरोपींची सुटका करताना न्यायालयाने हा निर्णय कैद्यांच्या चांगल्या वर्तनावर आणि या प्रकरणात दोषी ठरलेल्या एजी पेरारिवलन याच्या मे महिन्यात झालेल्या सुटकेवर आधारित असल्याचे म्हटले होते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अटकेच्या वेळी तो 19 वर्षांचा होता आणि 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होता.

या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य आणि पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत काँग्रेसने या निर्णयावर जोरदार टीका केली. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे हत्या करण्यात आली होती. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!