AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT | देशात समान नागरिक कायदा कधी लागू होणार? अमित शाह यांच्याकडून महत्त्वाची माहिती

"हिंदू धर्माच अनुसरण करणाऱ्या लोकांनी बऱ्याच सामाजिक सुधारणा स्वीकारल्या आहेत. आम्ही हुंडा विरोधी कायदा बनवला, कोणी विरोध केला नाही. सती प्रथा बंद केली. बहुपत्नी प्रथा समाप्त केली. कोणी विरोध केला नाही. यूसीसीवरुन गैरसमज निर्माण केले जातायत"

WITT | देशात समान नागरिक कायदा कधी लागू होणार? अमित शाह यांच्याकडून महत्त्वाची माहिती
Amit Shah
| Updated on: Feb 28, 2024 | 10:08 AM
Share

नवी दिल्ली : व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता सम्मेलन कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री समान नागरिक कायद्याबद्दल बोलले. देशात निवडणुकीतनंतर UCC लागू होईल, असं अमित शाह म्हणाले. त्याआधी विश्लेषण होईल असं ते म्हणाले. सगळ्यांसाठी UCC राजकीय मुद्दा असू शकतो. पण तो एक सामाजिक सुधारणेचा विषय आहे असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. कुठल्या धर्माच्या आधारावर कायदा नको, अशी देशाच्या लोकशाहीची मागणी आहे असं अमित शाह म्हणाले. देशाचा कायदा परिस्थितीच्या अनुकूल आणि जनतेच्या हिताचा पाहिजे. आमच्या संविधान सभेने अनुच्छेद-44 च लक्ष्य ठेवलं होतं. विधान मंडळ आणि संसद योग्यसमयी समान नागरिक कायदा आणेल, असं अमित शाह म्हणाले.

भाजपाची स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही सांगत होतो की, 370 हटवणार, समान नागरिक कायदा आणणार, तीन तलाकची प्रथा संपवणार आणि अयोध्येत राम मंदिर बनवणार असं अमित शाह म्हणाले. संविधान सभेत जवाहर लाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आजाद, केएम मुंशी होते. सगळ्यांनीच UCC चा मुद्दा मांडला होता. समजत नाही, काँग्रेसला अचानक काय झालं? कमीत कमी आपल्या आजोबांची गोष्ट लक्षात ठेवा.

हे अमित शाह यांचं मोठ विधान

यूसीसी कायदा उत्तराखंडमध्ये लागू झालाय. याची सोशल, ज्यूडीशियल आणि वैधानिक स्क्रूटनी झाली पाहिजे, हे अमित शाह यांचं मोठ विधान आहे. उत्तराखंड सरकारने यूसीसी आणलय. निवडणुकीपर्यंत त्याची स्क्रूटनी होईल. निवडणुकीनंतर सर्व राज्य विचार करतील आणि संपूर्ण देशात यूसीसी लागू होईल. उत्तराखंडमध्ये UCC लागू झाल्यावर अमित शाह म्हणाले की, “ही सर्वात मोठी सुधारणा आहे. यूसीसीवर व्यापक चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर देशात हा कायदा लागू झाला पाहिजे”

यूसीसीला हिंदू कोड बिल बोलण्यावर अमित शाह काय म्हणाले?

यूसीसीला हिंदू कोड बिल बोलल्यानंतर अमित शाह म्हणाले की, “काही लोक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हिंदू धर्माच अनुसरण करणाऱ्या लोकांनी बऱ्याच सामाजिक सुधारणा स्वीकारल्या आहेत. आम्ही हुंडा विरोधी कायदा बनवला, कोणी विरोध केला नाही. सती प्रथा बंद केली. बहुपत्नी प्रथा समाप्त केली. कोणी विरोध केला नाही. यूसीसीवरुन गैरसमज निर्माण केले जातायत”

देशातील चांगले वकील काँग्रेस पक्षात

गृहमंत्री अमित शाह टीवी9 च्या सत्ता सम्मेलनात म्हणाले की, “काँग्रेसने 10 वर्षात 12 लाख कोटीचे घोटाळे केले. देवास घोटाळा. कॉमनवेल्थ घोटाळा, समुद्रात सबमरीन घोटाळा आणि कोळसा घोटाळा केला. आता घाबरतायत. इतकी भिती वाटते, तर न्यायालयात जा. अंतरिम जामीन घ्या. देशातील चांगले वकील काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी न्यायालयात गेलं पाहिजे”

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं