AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेचा प्रवास वेगवान होणार, मनमाड ते नांदगाव 25 किमीचा तिसरा रेल्वे मार्ग तयार

मनमाड-नांदगाव सेक्शनची 25.09 किमीची नवीन तिसरी लाईन सुरू झाली असून रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी (CRS) 130 किमी वेगात रेल्वे चालवून चाचणी घेतली आहे.

मध्य रेल्वेचा प्रवास वेगवान होणार, मनमाड ते नांदगाव 25 किमीचा तिसरा रेल्वे मार्ग तयार
130 kmph speed trial Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 24, 2023 | 8:55 PM
Share

मुंबई | 24 ऑगस्ट 2023 : मध्य रेल्वेने मनमाड ते नांदगाव सेक्शन दरम्यानची 25.09 किमीची नवीन तिसरी मार्गिका विद्युतीकरणासह सुरु केली आहे. भुसावळ ते मनमाड या 183.94 किमीच्या महत्वाकांक्षी तिसऱ्या रेल्वे मार्गापैकी मनमाड ते नांदगाव हा 25.09 किमीचा मार्ग तयार झाल्याने प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई-हावडा या व्यस्त मार्गाचा अविभाज्य भाग असलेल्या मनमाड-भुसावळ विभागातील वाहतूक गर्दी कमी करण्यासाठी या नवीन 3 ऱ्या लाइनची यशस्वी अंमलबजावणी होणार आहे. यामुळे ट्रेनच्या संख्येत वाढ होणार आहे. तसेच संपूर्ण रेल्वे नेटवर्कवर ट्रेनचा वेग देखील वाढणार आहे.

मध्य रेल्वेच्या वर्दळीच्या भुसावळ- मनमाड दरम्यान 183.94 किमी लांबीचा तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यापैकी मनमाड-नांदगाव सेक्शनची 25.09 किमीची नवीन तिसरी लाईन विद्युतीकरणासह यशस्वीपणे सुरू झाली आहे. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी (CRS) यांच्या देखरेखीखाली सुरक्षा तपासणी करण्यात येऊन आणि 130 किमी वेगात रेल्वे चालवून चाचणी घेण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा मनोज अरोरा, भुसावळ विभाग विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, मुख्य अभियंता एस.के.झा, उपमुख्य अभियंता किशोर सिंह अन्य वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते.

1360.16 कोटी रुपयांचे बजेट

1360.16 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या भुसावळ-मनमाड 3र्‍या मार्गापैकी मनमाड-नांदगाव सेक्शनची 25.09 किमीची नवीन तिसरी लाईन तयार झाली आहे. प्रस्तावित विद्युतीकरणापैकी भुसावळ ते मनमाड या एकूण 183.94 किमी रेल्वे मार्गापैकी 96.81 किमी मार्ग पूर्ण झाला आहे, एकूण उद्दिष्टाच्या दिशेने 52% काम झाले आहे. भुसावळ-पाचोरा विभागाचा 71.72 किमी लांबीचा भाग यापूर्वीच यशस्वीरित्या बांधून सुरु करण्यात आला आहे.

47 पुलांची गरज आहे

भुसावळ ते मनमाड 183.94 किमी लांबीच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी एकूण 47 पुलांची गरज आहे, ज्यामध्ये 6 मोठे आणि 41 लहान पूल आहेत. पांझन स्थानकाजवळील 700 मीटरच्या अंतरावर रॉक-कटींगचे कठीण काम झाले आहे. या विभागात मनमाड जंक्शन, पानेवाडी, हिसवाहळ, पांझण आणि नांदगाव अशी स्थानके आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.