AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10वी परीक्षेत शेतकरी आंदोलनाचा ‘हिंसक’ असा उल्लेख, उपद्रवींपासून वाचण्यासाठी उपायांबाबत विचारला प्रश्न!

इंग्रजी भाषेच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेतील लेटर टू एडिटर या सदरात आंदोलकांना 'violent maniacs' असं म्हणण्यात आलं आहे.

10वी परीक्षेत शेतकरी आंदोलनाचा 'हिंसक' असा उल्लेख, उपद्रवींपासून वाचण्यासाठी उपायांबाबत विचारला प्रश्न!
संग्रहित छायाचित्र.
sagar joshi
sagar joshi | Updated on: Feb 20, 2021 | 2:58 PM
Share

चेन्नई : शहरातील प्रसिद्द CBSC स्कूल आता विवादात सापडलं आहे. कारण, या शाळेत 10 वीच्या विद्यार्थ्यांना राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली. त्यावेळी झालेल्या हिंसाचारावरुन या परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला आहे. विचारलेल्या प्रश्नात आंदोलकांचा उपद्रवी आणि हिंसक उन्मादी असा उल्लेख करण्यात आला आहे. इंग्रजी भाषेच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेतील लेटर टू एडिटर या सदरात आंदोलकांना ‘violent maniacs’ असं म्हणण्यात आलं आहे. इतकच नाही तर या प्रश्नामध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबाबत आपले विचार मांडण्यास सांगितलं गेलं आहे.(chennai schools exam paper calls protesting farmers violent maniacs)

11 फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. त्या प्रश्नपत्रिकेत हिंसक आंदोलकांपासून कशाप्रकारे वाचलं गेलं पाहिजे, याबाबत उपाय विचारले आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे की, अशा हिंसक आंदोलकांचा सामना कशाप्रकारे केला जावा, जे बाहेरील विचारांच्या प्रभावात येऊन कार्य करतात.

संगीतकार टीएम कृष्णा यांच्याकडून प्रश्न ट्वीट

संगीतकार टीएम कृष्णा यांनी प्रश्नपत्रिकेतील तो वादग्रस्त प्रश्न ट्वीट केला आहे. सोशल मीडियावर लोक आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर संतापही व्यक्त करत आहेत. हा चेन्नईतील एका प्रतिष्ठित शाळेतील 10वी चा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. कृषी कायदे आणि प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावर अद्याप चर्चा सुरु आहे. असं असताना इथं आंदोलकांना ‘हिंसक उन्माद’ बोललं गेलं आहे

नेमका प्रश्न काय?

‘प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे लोकांचे मन निंदा आणि घृणाने भरले आहे. कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान केलं. तसंच दिवसाढवळ्या पोलिसांवर हल्ला चढवला. अशावेळी आपल्या शहरातील एका दैनिकाच्या संपादकाला पत्र लिहा, त्यात आंदोलकांच्या हिंसक कृत्याची निंदा करा, जे हे जाणून घेण्यात कमी पडले की देश वैयक्तिक गरजा आणि फायद्याच्या आधी येतो. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, राष्ट्रध्वजाचा अपमान करणं आणि पोलिसांवर हल्ला करणं हे त्या अपराधांपैकी एक आहेत, जे कधी कुठल्याही कारणामुळे योग्य ठरवले जाऊ शकत नाहीत’.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?

Farmers protest | शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार?, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणण्याचा राकेश टिकैत यांचा इशारा

chennai schools exam paper calls protesting farmers violent maniacs

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...