देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील 50 टक्के मुलांपर्यंत इंटरनेट सुविधा नाही!

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील 50 टक्के मुलांपर्यंत इंटरनेट सुविधा नाही!
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 2:49 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम उद्योगधंदे, व्यापार, आदी गोष्टींवर झाला आहेच. सोबतच शिक्षणक्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर नियमावली जारी करुन शाळा सुरु करण्यात आल्या. पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडण्यात आलाय. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.(50 percent of students in urban and rural areas do not have access to internet)

सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेबाबत एका लर्निंग स्पायलरने सर्वेक्षण केलं आहे. त्यात हे स्पष्ट झालं आहे की, ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत इंटरनेटची सुविधाच नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षांचा पर्यायही कमी पडल्याचं दिसून येत आहे.

सर्वेक्षणातून काय समोर?

1. केरळमधील 51 टक्के ग्रामीण भागातील कुटुंबांची इंटरनेटपर्यंत पोहोच आहे. पण केवळ 21 टक्के कुटुंबांच्या घरातच ही सुविधा आहे.

2. आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये 30 टक्के कुटुंबांची पोहोच इंटरनेटपर्यंत आहे. पण फक्त 2 टक्के कुटुंबांकडेच ही सुविधा उपलब्ध आहे.

3. पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये फक्त 7 – 8 टक्के ग्रामीण कुटुंबांची पोहोच इंटरनेटपर्यंत आहे. तर शहरांमध्ये हे प्रमाण 18 ते 21 टक्क्यांपर्यंत आहे.

4. शहरांमध्ये राहणाऱ्या जवळपास 85 टक्के विद्यार्थ्यांची इंटरनेटपर्यंत पोहोच आहे. पण फक्त 41 टक्के विद्यार्थ्यांकडेच ही सुविधा उपलब्ध आहे.

5. ग्रामी भागात शिकणाऱ्या 28 टक्के विद्यार्थांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे.

6. ग्रामीण भागात शिकणाऱ्या 48 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधाच नाही.

7. फक्त 42 टक्के ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरीच इंटरनेटचा वापर केला जातो. तर शहरीत भागातील 69 टक्के विद्यार्थी ऑनलाईन राहू शकतात.

दुर्गम भागात वीज आणि इंटरनेट पोहोचवणं कठीण

याबाबत लर्निंग स्पायलरचे एमडी मनीष मेहता यांनी सांगितलं की, दुर्गम भागात वीज आणि इंटरनेची सुविधा पोहोचवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. मात्र, आव्हान पेललं तरंच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कंम्प्यूटर आणि स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणासाठी वीजेची मोठी गरज आहे. वीज असेल तरच इंटरनेट कनेक्ट केलं जाऊ शकतो. इंटरनेट आणि साधनांची कमतरताही ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण निर्माण ठरु शकते.

इतर बातम्या :

Metro Man E Sreedharan | मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार

Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

50 percent of students in urban and rural areas do not have access to internet

Non Stop LIVE Update
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.