AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील 50 टक्के मुलांपर्यंत इंटरनेट सुविधा नाही!

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील 50 टक्के मुलांपर्यंत इंटरनेट सुविधा नाही!
| Updated on: Feb 18, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम उद्योगधंदे, व्यापार, आदी गोष्टींवर झाला आहेच. सोबतच शिक्षणक्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर नियमावली जारी करुन शाळा सुरु करण्यात आल्या. पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडण्यात आलाय. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील 50 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.(50 percent of students in urban and rural areas do not have access to internet)

सध्या सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेबाबत एका लर्निंग स्पायलरने सर्वेक्षण केलं आहे. त्यात हे स्पष्ट झालं आहे की, ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत इंटरनेटची सुविधाच नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षांचा पर्यायही कमी पडल्याचं दिसून येत आहे.

सर्वेक्षणातून काय समोर?

1. केरळमधील 51 टक्के ग्रामीण भागातील कुटुंबांची इंटरनेटपर्यंत पोहोच आहे. पण केवळ 21 टक्के कुटुंबांच्या घरातच ही सुविधा आहे.

2. आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये 30 टक्के कुटुंबांची पोहोच इंटरनेटपर्यंत आहे. पण फक्त 2 टक्के कुटुंबांकडेच ही सुविधा उपलब्ध आहे.

3. पश्चिम बंगाल आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये फक्त 7 – 8 टक्के ग्रामीण कुटुंबांची पोहोच इंटरनेटपर्यंत आहे. तर शहरांमध्ये हे प्रमाण 18 ते 21 टक्क्यांपर्यंत आहे.

4. शहरांमध्ये राहणाऱ्या जवळपास 85 टक्के विद्यार्थ्यांची इंटरनेटपर्यंत पोहोच आहे. पण फक्त 41 टक्के विद्यार्थ्यांकडेच ही सुविधा उपलब्ध आहे.

5. ग्रामी भागात शिकणाऱ्या 28 टक्के विद्यार्थांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे.

6. ग्रामीण भागात शिकणाऱ्या 48 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधाच नाही.

7. फक्त 42 टक्के ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरीच इंटरनेटचा वापर केला जातो. तर शहरीत भागातील 69 टक्के विद्यार्थी ऑनलाईन राहू शकतात.

दुर्गम भागात वीज आणि इंटरनेट पोहोचवणं कठीण

याबाबत लर्निंग स्पायलरचे एमडी मनीष मेहता यांनी सांगितलं की, दुर्गम भागात वीज आणि इंटरनेची सुविधा पोहोचवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. मात्र, आव्हान पेललं तरंच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कंम्प्यूटर आणि स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापर केला जाऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणासाठी वीजेची मोठी गरज आहे. वीज असेल तरच इंटरनेट कनेक्ट केलं जाऊ शकतो. इंटरनेट आणि साधनांची कमतरताही ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण निर्माण ठरु शकते.

इतर बातम्या :

Metro Man E Sreedharan | मेट्रोमॅन ई. श्रीधरन भाजपमध्ये जाणार, विजय यात्रेदरम्यान प्रवेश करणार

Corona Guidelines | कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

50 percent of students in urban and rural areas do not have access to internet

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.