AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश

मोठी बातमी समोर येत आहे. चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. भारत हा आमचा प्रतिस्पर्धी देश नाहीये, तर आमचा नैसर्गिक भागिदार देश आहे, असं चीनने म्हटलं आहे.

चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश
xi jinpingImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 08, 2026 | 6:10 PM
Share

अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आल्यानंतर भारताची चीन आणि रशियासोबतची जवळीक चांगलीच वाढल्याचं पहायला मिळालं होतं. चीनकडून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा निषेध देखील करण्यात आला होता. जर अमेरिका भारतावर टॅरिफ लावत असेल तर भारतीय वस्तूंना आपल्या बाजारपेठा खुल्या आहेत, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. चीन, भारत रशिया या त्रिपक्षीय संबंधांवर बोलताना चीनने भारताचं कौतुक केलं आहे. भारत हा आमचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश असल्याचं चीनने म्हटलं आहे. आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीयेत, तर एक नैसर्गिक व्यापारी भागीदार देश आहोत, असं चीनने म्हटलं आहे.

त्यामुळे एकमेकांबाबत चांगले संबंध निर्माण करणे, त्यांची जोपासना करणे हे आमच्या तीन्ही देशांच्या हिताचं असल्याचं चीनने म्हटलं आहे. तसेच हे जगात शांती, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी देखील आवश्यक असल्याचं चीनने म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लिन जियान यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले लिन जियान?

चीन, रशिया आणि भारत या तीन्ही सध्या जगात सर्वाधिक झपाट्याने वाढत असलेल्या अर्थव्यवस्था आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत चांगले संबंध ठेवणे जगासाठी खूप फायद्याचं आहे. भविष्यात व्यापारी आणि संरक्षण विषयक संबंध आणखी मजबूत व्हावेत यासाठी चर्चा सुरूच राहील असं चीनने म्हटलं आहे. दरम्यान सध्या भारत आणि चीन सीमेवर देखील कोणतीही तणावपूर्ण स्थिती नसून, स्थिर परिस्थिती आहे. त्यामुळे आता अशीच स्थिती सीमावर्ती भागात ठेवण्याची गरज आहे. चीन आणि भारताला एकमेकांचे शत्रू नाही तर मित्र होण्याची गरज आहे. व्यापारी संबंध अधिक मजबूत झाले पाहिजेत असंही यावेळी लिन जियान यांनी म्हटलं आहे. चीनने भारतासोबतच रशियाचं देखील कौतुक केलं आहे. तीन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारले पाहिजेत, यावर चीनने जोर दिला आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर