AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab: ‘मान’लं पाहिजे! पंजाबमध्ये थेट घरात राशन येणार, भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंजाबमध्ये (Punjab) नोकरभरती सुरू करणाऱ्या भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी आज पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Punjab: 'मान'लं पाहिजे! पंजाबमध्ये थेट घरात राशन येणार, भगवंत मान सरकारचा मोठा निर्णय
एक नंबर मुख्यमंत्री !Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2022 | 12:47 PM
Share

चंदीगड: मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंजाबमध्ये (Punjab) नोकरभरती सुरू करणाऱ्या भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी आज पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. भगवंत मान सरकारने पंजाबमध्ये आता राशनची डोअर स्टेप डिलिव्हरी (Rashion Door Step Delivery) करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मान सरकार राज्यातील जनतेला घरपोच राशन देणार आहे. त्यामुळे पंजाबमधील नागरिकांना राशन दुकानावर रांगा लावण्याची गरज पडणार नाही. हे काम रेशनिंग अधिकारी करणार आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने ही योजना सुरू केली होती. मात्र, केंद्र सरकारने ही योजना रोखली होती. मात्र, आम्ही पंजाबमध्ये ही योजना लागू करणार आहोत, असं भगवंत मान यांनी स्पष्ट केलं. मान यांच्या या निर्णयामुळे धान्याचा काळाबाजार रोखला तर जाणार आहेच, शिवाय प्रत्येकाला रांगेत उभं न राहता राशन मिळणार आहे.

पंजाब आम आदमी पार्टीने ट्विटरवरून मुख्यमंत्री भगवंत मान मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून हा निर्णय जाहीर केला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षातही गरीबांना राशन घेण्यासाठी रेशन दुकानाच्या लांबच लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. जग प्रचंड डिजीटल झालं आहे. एका फोन कॉलवर कोणतीही गोष्ट घरपोच मिळते. मग राशन का मिळू नये? असा सवाल भगवंत मान यांनी केला आहे.

राशनसाठी रोजंदारी बुडवावी लागते

अनेकदा गरीबांना राशन घेण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागते. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ज्या लोकांचं हातावर पोट आहे, त्यांना आपला रोजगार बुडवावा लागणं वाईट आहे. दोन दोन किलोमीटरची पायपीट करून राशन आणायला जाणाऱ्या बुजुर्ग आईवडिलांनाही मी ओळखतो. अनेकदा राशन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असते. त्याला वारंवार साफ करावे लागते. तरीही त्यांना ते खावं लागतं. मात्र, आता असे होणार नाही, असं मान म्हणाले.

पीठ आणि डाळही

तुम्ही निवडलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारने गोरगरीबांना घरापर्यंत राशन देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही डोअर स्टेप डिलिव्हरी म्हणजे घरापर्यंत राशन देणार आहोत. पीठ आणि डाळीही तुम्हाला घरापर्यंत देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

पंजाबच्या आमदारांना एकच पेन्शन मिळणार, कोट्यवधी रुपये जनतेवर खर्च करणार, Bhagwant Mann यांचा मास्टरस्ट्रोक

Success Story | रुग्णसेवा करत काळ्या आईचीही मशागत, डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता परदेशात निघाले, वाचा सविस्तर

Goa CM Oath Taking Ceremony: हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत… देवाचो सोपूत घेता की… सावंत यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली