AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ घोडचुकीवर सरन्यायाधीशांचंच मोठं विधान; सत्तासंघर्षाच्या खटल्याला कलाटणी मिळणार?

राज्यपालांचेही राजकीय संबंध असतात. अविश्वास प्रस्तावानंतरच राज्यपालांची भूमिका येते. पण या प्रकरणात राज्यपालांनी संविधानाची पायमल्ली केली आहे, असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' घोडचुकीवर सरन्यायाधीशांचंच मोठं विधान; सत्तासंघर्षाच्या खटल्याला कलाटणी मिळणार?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: | Updated on: Feb 23, 2023 | 2:01 PM
Share

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जायला हवं होतं. बहुमत चाचणीला सामोरे जाऊन त्यांनी सर्व गोष्टी रेकॉर्डवर आणायला हव्या होत्या. ते बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले असते किंवा त्यांना इतर पक्षात जावं लागलं असतं. त्यामुळे आज शिवसेना पक्ष आणि चिन्हही उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं नसतं, असं राजकीय नेते, राजकीय विश्लेषक आणि कायद्याचे अभ्यासक वारंवार सांगत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयातही नेमका याच मुद्द्यावर सरन्यायाधीस डीवाय चंद्रचूड यांनी बोट ठेवलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या खटल्याला कलाटणी मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज सत्तासंघर्षावर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर लंच पूर्वी तासभर आधी ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मोठं विधान केलं. तुम्ही राजीनामा दिल्याने अधिकार गमावला आहे. तुमच्या विरोधात 39 आमदारांनी कुठेही मतदान केलं नाही. तुम्ही बहुमत चाचणीला पुढे गेला नाही. आम्ही काय करावं?, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला.

तर चाचणी रद्द केली असती

तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला नाही. तुम्ही बहुमत चाचणीला सामोरे गेला असता आणि 39 आमदारांनी विरोधात मतदान केल्याने हरला असता तर आम्ही ती बहुममत चाचणी रद्द केली असती. पण तुम्ही राजीनामा दिल्यानं अधिकार गमावला. आम्ही परिस्थिती जैसे थे कशी करणार?, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. तर जे झालं ते आता आम्ही बदलू शकत नाही, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

राज्यापालांनी नितिमत्ता पाळावी

यावेळी अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाच्या निकालात बऱ्याच ठिकाणी फुटीचा उल्लेख आहे. राज्यपालांनी अशावेळी नितिमत्ता पाहायला हवी. आकडेवारी नाही. अविश्वास ठराव सहा महिन्यात एकदा आणता येतो, असं सांगतानाच सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणात हस्तक्षेप करावा की नाही यावर माझा युक्तिवाद असेल असं सिंघवी म्हणाले. राज्यपालांचेही राजकीय संबंध असतात. अविश्वास प्रस्तावानंतरच राज्यपालांची भूमिका येते. पण या प्रकरणात राज्यपालांनी संविधानाची पायमल्ली केली आहे, असा दावा त्यांनी केला.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.