AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“AAP के साथ काँग्रेस का हाथ”; केंद्राच्या त्या अध्यादेशाविरोधात एकत्र, नेमकं प्रकरण काय..?

केंद्राने आपले अधिकार वापरून नॅशनल कॅपिटल सर्व्हिस अथॉरिटीची स्थापना केल्यावर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये हे राजकीय वैर वाढले आहे.

AAP के साथ काँग्रेस का हाथ; केंद्राच्या त्या अध्यादेशाविरोधात एकत्र, नेमकं प्रकरण काय..?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 22, 2023 | 11:08 PM
Share

नवी दिल्ली : कधी काळी एकमेकांविरोधात दंड थोपटून उभा राहिलेले आप आणि काँग्रेस आता हातात हात घालून एकाच मुद्यावर केंद्र सरकारविरोधात लढत आहेत. काँग्रेसने आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार दिल्लीतील उपराज्यपालांना नोकरशहांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे सर्व अधिकार देणाऱ्या अध्यादेशाविरोधात काँग्रेसही आम आदमी पक्षाबरोबर पाठिंबा देत केंद्रावरिोधाता उभा राहिली आहे. आम आदमी पक्ष या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांचीही मदत घेत असून याआधी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही केंद्राच्या या अध्यादेशाविरोधात अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता भाजपविरोधातील पक्ष या एकाच मुद्यावर एकत्र येताना दिसून येत आहेत.

नितीश कुमार यांनी केंद्राच्या या अध्यादेशला ‘संविधानविरोधी’ असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ते बोलत होते.

लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला दिलेले अधिकार कसे काढून घेतले जाऊ शकतात. त्यावरुन ही गोष्ट संविधानाच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे नितिश कुमार यांनी म्हटले आहे की, मी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विरोधी ऐक्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नितीशकुमार यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली होती.

या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते. या बैठकीनंतरच काँग्रेस पक्ष अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना पाठिंबा देणार असल्याचे वृत्तही समोर आले होते. विरोधक एकजुटीच्या दिशेने जात असल्याने हेही एक सकारात्मक पाऊल असल्याचे मानले जात आहे.

केंद्राने आपले अधिकार वापरून नॅशनल कॅपिटल सर्व्हिस अथॉरिटीची स्थापना केल्यावर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये हे राजकीय वैर वाढले आहे.

त्यामुळे केंद्राने एक अध्यादेश आणला आहे ज्यामध्ये दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरला सर्व पदांबाबत, दक्षता आणि इतर आपत्कालीन बाबींमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार