AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भाजपला जबर हादरा, काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Datia Bypoll Result : मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

मोठी बातमी! भाजपला जबर हादरा, काँग्रेसच्या उमेदवाराचा दणदणीत विजय
Datiya MP ResultImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 03, 2026 | 5:36 PM
Share

विविध राज्यात रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने या मतदारसंघातून आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने घनश्याम सिंह यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून घनश्याम सिंह 6029 मतांनी विजयी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, मतमोजणीदरम्यान घनश्याम सिंह यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती, ही आघाजी शेवटपर्यंत कायम ठेवत त्यांनी 6,029 मतांनी विजय मिळवला आहे. दतियातून माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या जागी भाजपने आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते विजय मिळवू शकले नाहीत. घनश्याम सिंह यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

कोण आहेत घनश्याम सिंह?

घनश्याम सिंह हे मध्य प्रदेशच्या राजकारणातील दतिया आणि परिसरात दीर्घकाळ सक्रिय असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते लोकांशी सातत्याने संपर्कात असलेले राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांना मोठा जनाधार आहे. ते अनेक वर्षांपासून काँग्रेसशी जोडलेले असून, एक प्रभावी वक्ते आणि तळागाळातील नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दतिया आणि सेवढा विधानसभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे.

घनश्याम सिंह यांचा राजकीय प्रवास

घनश्याम सिंह यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. ते दतिया मतदारसंघातून दोनदा आणि सेवढा मतदारसंघातून एकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 1993 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून विजय मिळवला होता, 1998 मध्ये त्यांचा पराभव झाला. 2003 मध्ये पुन्हा विजय मिळवत ते आमदार झाले. 2008 मध्ये भाजपचे नरोत्तम मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला. 2013 मध्ये भाजपचे प्रदीप अग्रवाल यांच्याकडून त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला. 2018 मध्ये सेवढा मतदारसंघातून निवडणूक लढवत भाजपचे राधेलाल बघेल यांचा पराभव करून आमदार झाले. 2023 मध्ये सेवढा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली, मात्र भाजपचे प्रदीप अग्रवाल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांनी दतिया पोटनिवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे.

पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर

2023 साली झालेल्या पराभवानंतर घनश्याम सिंह यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला. त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला. ते दतिया आणि सेवढा मतदारसंघात सक्रिय होते. दरम्यान, दतियाचे काँग्रेस आमदार राजेंद्र भारती यांची एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर त्यांचे आमदारपद रद्द झाले आणि पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने या निवडणुकीत घनश्याम सिंह यांना उमेदवारी दिली होती. यात विजय मिळवत काँग्रेसने ही जागा आपल्याकडेच ठेवली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी